एक्स्प्लोर

नवी मुंबई स्वच्छ, तर भुसावळ अस्वच्छ शहरांच्या यादीत!

नवी दिल्ली: एकीकडे पुण्याचा उकीरडा झाला असताना, दुसरीकडे नवी मुंबई शहराचा मात्र देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे. या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे. दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीतलं गोंडा हे सर्वात तळाला आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरं ही गुजरातमधली आहेत . तर उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात तळाला आहे.  सर्वात अस्वच्छ शहरांमधे 20 शहरं एकट्या यूपीमधली आहेत अर्थात वाराणसीचा क्रमांक मात्र मागच्यावेळी 400 च्या घरात होता, तो यावेळी 32 वर सुधारला आहे. टॉप टेन स्वच्छ शहरं
  1. इंदूर- मध्य प्रदेश
  2. भोपाळ - मध्य प्रदेश
  3. विशाखापट्टणम - आंध्र प्रदेश
  4. सुरत- गुजरात
  5. म्हैसूर- कर्नाटक
  6. तिरुचिरापल्ली- तामिळनाडू
  7. नवी दिल्ली -
  8. नवी मुंबई - महाराष्ट्र
  9. तिरूपती - आंध्र प्रदेश
  10. बडोदा- गुजरात
स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील किती शहरं? 8 - नवी मुंबई 13-  पुणे 29-  मुंबई 56- शिर्डी 72- पिंपरी चिंचवड 76- चंद्रपूर www.abpmajha.in 89- अंबरनाथ 115 - सोलापूर 116- ठाणे 124- धुळे 130- मीरा भाईंदर 137 - नागपूर 139- वसई-विरार 141 - इचलकरंजी 151 - नाशिक 157 - सातारा 158 - पुळगाव - बदलापूर www.abpmajha.in 162 - जळगाव 170 - पनवेल 177 - कोल्हापूर 181 - नंदुरबार 183 - अहमदनगर 192 - नांदेड- वाघाला 207 - उल्हासनगर 219 - उस्मानाबाद 229 - परभणी 230- यवतमाळ 231 - अमरावती 234 - कल्याण-डोंबिवली 237- सांगली-मिरज-कुपवाड 239- मालेगाव 240 - उदगीर 287 - बार्शी 296 - अकोला 299- औरंगाबाद www.abpmajha.in 302- बीड 311 - अचलपूर - अकोला 313 - वर्धा 318 - लातूर 343 - गोंदिया 355  - हिंगणघाट - 368 - जालना 392-  भिवंडी निजामपूर 433 - भुसावळ नवी मुंबई कसं झालं स्वच्छ? गेल्या दोन वर्षात नवी मुंबई महापालिकेने राबविलेल्या विविध योजनांमुळे हा पुरस्कार पालिकेच्या झोळीत आला आहे. यामध्ये संपूर्ण शहरात टॉयलेट उभारणे, शहरातील घणकचऱ्याचे योग्य नियोजन, भिंतींना पेटिंग करणे, रस्त्यालगतच्या उद्यानांचे सुशोभिकरण करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहर हागणदारीमुक्त बनवण्यासाठी 1950 वैयक्तिक, 666 कम्युनिटी आणि 80 सार्वजनिक टॉयलेटची उभारणी पालिकेने केली आहे. शहरातून जाणारे सायन-पनवेल हायवे, पाम बीच रोड, ठाणे- बेलापूर हायवेवर ई-टॉयलेटची उभारणी करून वाहतूकदारांची सोय केली. नवी मुंबई स्वच्छ, तर भुसावळ अस्वच्छ शहरांच्या यादीत! शहरात दररोज 750 मेट्रिक टन घणकचरा गोळा होते. यामध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र होत असल्याने त्याचे वर्गीकरण करणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रत्येक सोसायटींना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे फर्मान पालिकेने सोडले होते. ज्या सोसायट्या हा नियम पाळत नव्हत्या त्यांचा कचरा उचलने बंद केल्यानंतर रहिवाशांना ओला-सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली. यातून 150 मेट्रिक टन ओला कचरा वेगळा झाल्याने त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात आली. तर सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करून त्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे. शहर स्वच्छ दिसतानाच आकर्षक होण्यासाठी पालिकेने महत्वाचे चौक, रस्ते, उद्यानांच्या भिंती रंगवल्या. या भिंतीवर प्राण्यांची, पक्षांची आकर्षक चित्रे काढली. तर काही ठिकाणी समाज प्रबोधनात्मक वाक्य प्रचार, संदेश लिहून जनजागृती केली. रस्त्यांच्या दुजाभकावर उद्याने उभा करून, झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. संबंधित बातम्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई 'टॉप-10'मध्ये!

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget