एक्स्प्लोर

CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना खुर्ची का गमवावी लागली?

गेल्या पाच वर्षात अमरिंदर यांनी केलेल्या नियुक्त्या पाहता त्यांनी कारभारात ब्युरोक्रसीवर अधिक विश्वास आणि आपल्या राजकीय सहकाऱ्यांना डावलल्याचं दिसलं.

CM Amarinder Singh Resigns: पंजाब काँग्रेसमधलं भांडण नवज्योत सिद्धु यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर मिटलंय असं वाटत होतं. असं असतानाच गेल्या 24 तासांत अशाकाही घडामोडी घडल्या की ज्यामुळे कॅप्टन अमरिंदर यांना राजीनामा द्यावा लागला. असं काय झालं की ज्यामुळे अमरिंदर यांची खुर्ची गेली. जाणून घेऊया अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याची कारणे.

1. प्रमुख विरोधकांना सॉफ्ट कॉर्नर

गुरु ग्रंथ साहिब जळीतकांडात झालेलं फायरिंग असो की डेरा सच्चा सौदा प्रकरण या प्रकरणांमध्ये पंजाब सरकारनं कणखरपणे बाजू न मांडल्याचा आरोप. कॅप्टन अमरिंदर हे बादल यांना सॉफ्ट कॉर्नर देत असल्यानंच त्यांनी या प्रकरणाचा तपास नीट होऊ दिला नाही असा आरोप कायम सिद्धू करत राहिले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणातून पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल हे सहीसलामत सुटत राहिले. 

2. ड्रग माफियांचा पर्दाफाश करण्यात अपयश

2017 च्या निवडणुकीत ज्या प्रमुख आश्वासनांवर काँग्रेसनं सत्ता मिळवली त्यापैकी हे एक. अगदी पवित्र ग्रंथाची शपथ घेत त्यावेळी अमरिंदर यांनी पंजाबमधलं ड्रग रॅकेट मोडून काढू असं आश्वासन दिलं होतं. पण गेल्या पाच वर्षात त्याबदद्ल कुठलीच कठोर कारवाई झाली नाही. या ड्रग रॅकेटमध्ये त्यांचे अनेक राजकीय विरोधकही होते. त्यांना इंगा दाखवण्यात अमरिंदर कमी पडले अशी टीका झाली.

3.  आमदारांचा पाठिंबा घटत गेला 

एकूण 117 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसला 2017 मध्ये 77 जागांवर विजय मिळाला. पण गेल्या काही दिवसांत अनेक आमदार कॅप्टन अमरिंदर यांच्या विरोधात होत गेले. काल जवळपास 45 आमदारांनी बैठक घेऊन नेतृत्व बदलावर चर्चा व्हावी अशी मागणी केली. 77 पैकी 44 हा जवळपास बहुमताचाच आकडा. त्यामुळेही हायकमांडवर पंजाबमध्ये अमरिंदर यांना हटवण्याबाबतचा दबाव वाढत गेला. 

CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

4. प्रशासनावर मदार, मुख्यमंत्री आमदारांना भेटेनात
   
गेल्या पाच वर्षात अमरिंदर यांनी केलेल्या नियुक्त्या पाहता त्यांनी कारभारात ब्युरोक्रसीवर अधिक विश्वास आणि आपल्या राजकीय सहकाऱ्यांना डावलल्याचं दिसलं. गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांचा आमदारांशी थेट संपर्कही कमी झाला होता. अनेक आमदारांनी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची तक्रार केली होतीच. 

5. काही बाहेरच्या संस्थांचा निवडणुकीबाबतचा सर्व्हे
   
पंजाबबाबत जे सर्वे पक्षाला येत होते, त्यात अनेक सर्व्हे हे अमरिंदर यांच्या नेतृ्त्वात पुन्हा निवडणूक अवघड असल्याचंच दाखवत होते. अमरिंदर यांचं वाढतं वय आणि आमदारांमधली घटती लोकप्रियता यामुळे त्यांची पकड कमी झाल्याचंही जाणवत होतं. याच पार्श्वभूमीवर हायकमांडला त्यांच्या पर्यायाचा शोध गरजेचा बनला होता. 

6. काही ताजे वाद
    
शेतकरी आंदोलनाबद्दल काँग्रेसनं सहानुभूतीची भूमिका ठेवली आहे. पण मागच्या आठवड्यात अमरिंदर यांनी आंदोलकांनी पंजाबमधून निघून जावं अशा पद्धतीचं विधान केलं. जालियानवाला बाग हत्याकांडाचं स्मारक ज्या पद्धतीनं सजवण्यात आलंय त्यावर राहुल गांधींनी थेट मोदींवर टीका केली होती. एखाद्या हत्याकांडाच्या स्मारकाला अशी रोषणाई करण्यात यावी का हा त्यांचा सवाल होता. पण कॅप्टन अमरिंदर पक्षाच्या बाजूनं बोलण्याऐवजी मोदींची भलामण करत राहिले. अशा सजावटीत आपल्याला काही गैर वाटत नाही, असं त्यांचं विधान दिल्ली हायकमांडचा संताप वाढवणारं ठरलं.

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget