एक्स्प्लोर

Rahul Gandhi Press Conference: शेतकऱ्यांना नको असलेले कृषी कायदे कायमचे स्थगित करा, राहुल गांधींची मागणी

मोदी सरकार शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करुन देशाला दुर्बल बनवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्याचबरोबत सरकारने नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशीही मागणी त्यांनी केली.

नवी दिल्ली: मोदी सरकार दोन वर्षे कृषी कायद्याला स्थगिती देणार होते, ती स्थगिती त्यांनी कायमची द्यावी आणि त्यासाठी आम्ही मदत करु असे काँग्रेस नेता राहुल गांधी म्हणाले. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दिल्लीत झालेला हिंसाचार यावर बोलताना राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले की, "तुम्ही दोन वर्षे कृषी कायदे स्थगित करणार होता, ते कायमचे स्थगित करा. वाटल्यास पुन्हा प्रयत्न करा. त्यासाठी आम्ही मदत करु. शेतकऱ्यांशी यावर चर्चा करा, सर्वांशी चर्चा करा. कृषी क्षेत्राला सुधारणांची गरज आहे हे तर आम्ही पण मान्य करतो."

शेतकऱ्यांवर लाठीमार करुन पंतप्रधान देशाला दुबळे बनवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Sanjay Raut | दिल्ली हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा पूर्वनियोजित कट -संजय राऊत

राहुल गांधी म्हणाले की, "मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करतंय. शेतकऱ्यांनी एक इंचही मागे हटू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत."

शेतकऱ्यांना लाल किल्याकडे कोणी जाऊ दिलं असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, "हे आंदोलन आता शहरांकडून गावात पसरेल. शेतकऱ्यांवर लाठीमार केल्याने हे आंदोलन मोडीत निघेल असा विचार पंतप्रधानांनी करु नये."

प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. यामुळे शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. दिल्ली पोलिसांनी या हिंसाचाराचा तपास सुरु केला असून त्यासंबंधी 44 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि 44 लोकांविरोधात लुकआउट नोटिस बजावली आहे. या हिंसाचारात 394 पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला मंजूरी देण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रॅन्च करत आहे.

या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी गाजीपूर बॉर्डरवर प्रदर्शन करत असलेल्या शेतकऱ्यांना ती जागा सोडण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या आदेशाला विरोध दर्शवला आहे. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जाहीर केलं आहे की ते आत्महत्या करतील पण आंदोलन स्थळ सोडणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, हिसांचारासंबंधी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेने जाहीर केली तारीख, मध्यस्थीसाठी पाकिस्तानात होणार बैठक 
मोठी बातमी! इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेने जाहीर केली तारीख, मध्यस्थीसाठी पाकिस्तानात होणार बैठक 
इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
E20 Petrol : इराण युद्धात ‘E20 पेट्रोल’ का चर्चेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं मोठं कारण
इराण युद्धात ‘E20 पेट्रोल’ का चर्चेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं मोठं कारण
आता कोरोनाच्या परिस्थितीसारखं आपण तयार राहायला हवं; नरेंद्र मोदींचं थेट संसदेतून देशवासीयांना आवाहन
आता कोरोनाच्या परिस्थितीसारखं आपण तयार राहायला हवं; नरेंद्र मोदींचं थेट संसदेतून देशवासीयांना आवाहन

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Maharashtra Live Blog: मुंबई महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन मिळवलेल्या पाण्याला मागणी, 12 रुपयांत 1000 लीटर पाणी शुद्ध
Maharashtra Live Blog: मुंबई महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन मिळवलेल्या पाण्याला मागणी, 12 रुपयांत 1000 लीटर पाणी शुद्ध
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?
पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?
Eknath Shinde and Devendra Fadnavis: साताऱ्यातील निवडणुकीवरुन भाजप-शिंदे गटात धुसफूस, एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, एसपी तुषार दोशींना अभय मिळणार?
Embed widget