एक्स्प्लोर

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरु, 17 जुलैला मतदान

नवी दिल्ली : आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसुचना जारी कऱण्यात येईल. 28 जून ही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज यूपीएच्या अनेक घटकपक्षांशी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदावार देण्यासंदर्भात विरोधी पक्षांनी तयार केलेल्या 10 सदस्यीस समितीची देखील पहिली बैठक आज दिल्लीत होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी एकमत होऊ शकलं नाही तर 17 जुलैला मतदान आणि 20 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपतो आहे. एनडीए आणि यूपीए या दोन्ही बाजूंनी या निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरु आहेत. नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी या निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्याला 17 पक्षांनी हजेरी लावलेली होती. यूपीच्या महाविजयानंतर एनडीएचं संख्याबळ वाढलेलं आहे. शिवाय जगमोहन रेडड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमितीचे के सी आर राव यांच्या पक्षानं एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. पण तरीही यूपीएकडून तुल्यबळ लढत देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यूपीएनं उमेदवारांच्या शोधसमितीसाठी शरद पवार यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे एखादा सर्वसहमतीचा उमेदवार पुढे येतो का हे ही पाहणं महत्वाचं आहे. राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया : उमेदवाराच्या अर्जावर 50 प्रस्तावक, 50 अनुमोदक असणं गरजेचं. उमेदवाराला निवडणुकीसाठी 15 हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार. – संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. – निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल. – यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( 1 ते… जितके उमेदवार) – राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही. – लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी राष्ट्रपती निवडणुकीची वैशिष्ट्ये- – निवडणुकीची अधिसूचना 14 जून रोजी काढण्यात येईल. – अर्ज करण्यासाठी शेवटी तारीख 28 जून असणार आहे. – उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी 29 जूनला होईल. – १ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल. – मतदानाची गरज पडली तर 17 जुलैला मतदान होईल. – मतमोजणी 20 जुलैला होईल. संबंधित बातम्या:  राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल वाजलं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले

राष्ट्रपती निवडणुकीची खलबतं, सोनिया गांधींनी बोलावली देशभरातील 17 विरोधी पक्षांची बैठक

स्पेशल रिपोर्ट : कोण होणार राष्ट्रपती?

उद्धव ठाकरे दिल्लीत, राष्ट्रपती निवडणुकीबाबत खलबतं

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget