एक्स्प्लोर

Satyapal Malik: इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो तर मोदींचाही पराभव होऊ शकतो; माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं भाकित

Satyapal Malik: सत्ता कायमस्वरूपी राहत नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी लक्षात घ्यावे आणि अराजक माजणार नाही याची काळजी घ्यावी असे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

Satyapal Malik: मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सत्ता येते आणि जाते, सत्ता ही स्थायी नसते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी समजून घ्यावे असे मलिक यांनी म्हटले. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना सत्तेवरून कोणीच हटवू शकत नाही असे लोक म्हणायचे. पण, त्यांचीदेखील सत्ता गेली. त्यामुळे परिस्थिती चिघळेल असे काही करू नये असे मलिक यांनी म्हटले.

मलिक यांनी रविवारी, जयपूरच्या राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या  एका कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, देशात वेगवेगळ्या पातळीवर लढाई सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. तर, युवकदेखील केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारतील असेही त्यांनी म्हटले.  मलिक यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांचीदेखील सत्ता गेली होती. त्यांची सत्ता जाणार नाही, असे लोक म्हणायची. सध्या मोदी यांच्या नेतृत्त्वातील सत्ता जाणार नाही असे लोक म्हणत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी समजून घ्यावे की सत्ता कायमस्वरुपी राहत नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल एवढी अराजकता निर्माण करू नका, असे मलिक यांनी म्हटले. 

अग्निपथ योजनेवर प्रश्नचिन्ह

सत्यपाल मलिक यांनी सैन्य भरतीसाठी सुरू असलेल्या 'अग्निपथ' योजनेवरही त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे भारतीय लष्कर कमकुवत होईल. तीन वर्षाचीच सेवा असल्याने देशासाठी बलिदान देण्यासाठी असलेली भावना संपून जाईल. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी तरुणांची असलेली प्रतिबद्धता, भावना तीन वर्षांच्या सेवा काळात दिसून येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

मलिक यांनी पुढे म्हटले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, अग्निवीरांना लष्करातील ब्रह्मोससह इतर क्षेपणास्त्रे, शस्त्रे यांना हाताळण्यासही मनाई असणार आहे.  त्यामुळे ही अग्निपथ योजना  भारतीय लष्करासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

बेधडक वक्तव्याने मलिक चर्चेत

सत्यपाल मलिक हे अनेकदा आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत  आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करत असताना तीनशे कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता असा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता. कायद्याच्या चौकटीबाहेरील कोणतेही काम आपण करणार नाही, असे म्हणत ती ऑफर नाकारली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. मेघालयाचे राज्यपाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अटक होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.  मागील काही महिन्यांपासून मलिक हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहेत. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
Ashok Kharat Nashik Crime: पोलिसांनी भोंदू अशोक खरातची 'दैवी' शक्ती उतरवली, क्राइम ब्रँचच्या ऑफिसमधून लंगडत अन् कण्हत बाहेर पडला, VIDEO व्हायरल
पोलिसांनी भोंदू अशोक खरातची 'दैवी' शक्ती उतरवली, क्राइम ब्रँचच्या ऑफिसमधून लंगडत अन् कण्हत बाहेर पडला, VIDEO व्हायरल
Embed widget