एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची एक बैठक अन् पाकिस्तानला हादरे, काही तासात 10 मोठे धक्के

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतानं पाच मोठे निर्णय घेत पाकिस्तानला धक्का दिला होता. 

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले  होते. भारत सरकारनं या घटनेनंतर महत्त्वाचे निर्णय घेतले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी सीसीएसची बैठक झाली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या निर्णयानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी झाला होता. बैसरण भागात दहशतवाद्यांनी गोळीबार करुन भारतीयांवर हल्ला केला. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिंध जल कराराला स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानच्या नागरिकांना 48 तासात देश सोडण्यास सांगण्यात आलं.  अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकच्या नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द करण्यात आले. भारतानं घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानला 10 मोठे धक्के बसले आहेत. 

पाकला बसलेले 10 धक्के 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर झाला. पाकिस्तानचं शेअर मार्केट क्रॅश झालं. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर केएसई-100  निर्देशांक 1024 अंकांनी घसरून 117,226 अंकांवर आला.  

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानच्या जीडीपीचा विकास दराचा अंदाज घटवला आहे. तो 3 टक्क्यांवरुन 2.6 टक्क्यांवर आणला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर फिच रेटिंग्जनं देखील पाकिस्तानच्या चलनासंदर्भात इशारा दिला आहे. पाकिस्तानचा रुपया जूनपर्यंत एका डॉलरसाठी 285 रुपयांपर्यंत घसरेल, असा अंदाज व्यक्त केला. 
 
सिंधू जल करार स्थगित करण्यात आल्यानं पाकिस्तानच्या शेती उत्पादनावर आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल. काही राज्यांमध्ये वीज संकट निर्माण होऊ शकतं. 

अटारी चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानचं जवळपास 3 हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं. पाकिस्तानकडून सोयाबीन, भाज्या, लाल मिर्चीसह इतर गोष्टींची भारतात निर्यात होत व्हायची ती बंद होणार आहे. 

जागतिक बँकेंन पाकिस्तानला इशारा देत चालू आर्थिक वर्षात 1 कोटी पाकिस्तानी नागरिकांच्या खाद्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला. देशात गरिबी वाढेल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

भारतानं पाकिस्तानी नागरिकांना दिलेला सार्क व्हिसा तातडीनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं यापुढे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येता येणार नाही. 

जे पाकिस्तानी लोक भारतात असतील त्यांना 48 तासांमध्ये देश सोडून जावं लागणार आहे. त्यामुळं जोपर्यंत तणाव कमी होत नाही तोपर्यंत ते पुन्हा भारतातयेऊ शकणार नाहीत. 

नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ती संख्या 55 वरुन 30 वर आणली गेली आहे. पाकिस्तानी संरक्षण सल्लागारांना देश सोडण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आला आहे. 

भारतानं पाकिस्तानंवर डिजिटल स्ट्राइक केला असून पाकिस्तान सरकारचं X खातं भारतात बॅन करण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget