एक्स्प्लोर

'आधार'मुळे मोबाईल फोन बंद होणार नाहीत : UIDAI

यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्या देशभरातील 50 कोटी युझरचे फोन बंद होऊ शकतात, असं वृत्त प्रसारित झालं होतं.

नवी दिल्ली : आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही, असं आश्वासन टेलीकॉम विभाग आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिलं आहे. टेलीकॉम विभाग आणि आधारने याबाबत आज (18 ऑक्टोबर) संयुक्त निवेदन जारी केलं आहे. आधार क्रमांक व्हेरिफेकेशनच्या आधारावर जारी केलेले सिम कार्ड जर नव्या व्हेरिफिकेशनमध्ये फेल ठरले, तर हे सिम कार्ड डिसकनेक्ट केले जाऊ शकतात. यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्या देशभरातील 50 कोटी युझरचे फोन बंद होऊ शकतात, असं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र हे वृत्त काल्पनिक आणि चुकीचं असल्याचं यूआयडीएआय, आधार प्राधिकरणाने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, "खासगी कंपन्या व्हेरिफिकेशनसाठी आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाहीत. फोन कनेक्शन किंवा बँक खाती आता आधारशी लिंक करणं गरजेचं नाही. खासगी कंपन्या युझरकडून याची मागणीही करु शकत नाहीत." या मुद्द्यावर सरकारमध्ये उच्च स्तरावर विचारविनिमय सुरु आहे. कारण जर मोठ्या संख्येने मोबाईल नंबर डिसकनेक्ट केले तर नागरिकांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकार नव्या केवायसीसाठी युझरना आवश्यक वेळ देईल. आधार प्रकरणात सुनावणी करताना आदेश दिला होता की, मोबाईल कंपन्या युझरच्या ओळखीसाठी आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाही. परंतु 50 कोटींपेक्षा जास्त मोबाईल नंबर आधार क्रमांकावरच सुरु होते. आधार क्रमांक हटल्यानंतर आणि त्याऐवजी दुसरं वैध जमा न केल्यास मोबाईल नंबर बंद होऊ शकतो. "सरकारला याची काळजी असून उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधार हटवून त्याऐवजी नवं ओळखपत्र जमा करेपर्यंत मोबाईल युझरला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कमीत कमी अडचणींसह हे प्रकरण कसं निकाली काढता येईल, याचा सरकार विचार करत आहे," असं टेलीकॉम सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget