एक्स्प्लोर

Bihar Election | नितीश कुमार यांचा 16 नोव्हेंबरला शपथविधी? मंत्रिमंडळावर अद्याप निर्णय नाही

पंतप्रधानांनी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास केला जाईल असे वक्तव्य केले आणि नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. ते सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. परंतु नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देताना महत्वाची खाती भाजप आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएला कौल दिल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल हे अजून ठरलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत एनडीएने 125 जागा जिंकल्या आहेत. परंतु नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत मोठी घट झाली असून त्यांचे केवळ 43 आमदार विजयी झाले आहेत.

पंतप्रधानांनी संभ्रम दूर केला एनडीएमध्ये सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आपलाच व्हावा अशी मागणी सुरु केली होती. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत भाजपने नितीश कुमारांना दिलेला शब्द आता ते पाळतील का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. काल बुधवारी झालेल्या दिल्लीतील भाजपच्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची शंका दूर केली. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली सत्ता बनेल हे स्पष्ट केले. परंतु नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देताना महत्वाची आणि जास्तीची खाती भाजप आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याच्या मार्गावर असणारे नितीश कुमार सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गेल्या सरकारचा कार्यकाल आता समाप्त झाला असल्याने ते आपला राजीनामा राज्यपालांना सोपवतील. आता पुन्हा एकदा नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दोन दशकात सात वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होणार आहे. नितीश कुमारांनी सर्वप्रथम 2000 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी बहुमतासाठी अपेक्षित संख्याबळ त्यांना जमवता आले नसल्याने राजीनामा द्यावा लागला होता.

नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. दुसऱ्यांदा 24 नोव्हेंबर 2005 साली ते बिहारचे मुख्यमंत्री बनले. 26 नोव्हेंबर 2010 साली त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चौथ्यांदा त्यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले. 20 नोव्हेंबर 2015 साली पाचव्यांदा पुन्हा एकदा त्यांनी शपथ घेतली. सहाव्या वेळी 27 जुलै 2017 साली ते परत एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला, ग्रामीण भागात 25 नव्हे तर 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट
गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला, ग्रामीण भागात 25 नव्हे तर 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget