एक्स्प्लोर

Migration: चार वर्षात 6.76 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; केंद्र सरकारची माहिती

गेल्या चार वर्षात जवळपास 6.76 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व (Indian nationality) सोडल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली. जवळपास 1.24 कोटी अनिवासी भारतीय (NRI) लोक हे जगभरात वास्तव्यास आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली: सन 2015 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 6.76 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला असून ते आता इतर देशात कायमचे स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली.

सन 2015 आणि 2016 साली 1.45 लाख नागरिक, सन 2017 साली 1.28 लाख नागरिक, सन 2018 साली 1.25 लाख नागरिक तर सन 2019 साली 1.36 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला अशी माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलं की एक कोटी 24 लाख 99 हजार 395 भारतीय नागरिक सध्या जगभरात वास्तव करत आहेत. यांच्यापैकी 37 लाख नागरिक हे OCI कार्डधारक आहेत.

या नागरिकांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे आपले भारतीय नागरिकत्व सोडले हे स्पष्ट करण्यात आलं नाही. तरीही रोजगारानिमित्त या लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय.

NRI | अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारकडं प्रस्ताव

भारतात एक लाख श्रीलंकन शरणार्थी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितलं की भारतातील तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत 93,032 श्रीलंकन नागरिक शरणार्थी म्हणून राहत आहेत. त्यामध्ये 58,843 श्रीलंकन नागरिक हे तामिळनाडूमधील विविध शिबिरात राहत आहेत तर 34,135 नागरिक हे विविध भागात राहत आहेत. या लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे असेही गृह राज्यमंत्री म्हणाले.

संयुक्त राष्ट्राने गेल्या महिन्यात प्रकाशित केलेल्या आपल्या 'इंटरनॅशनल मायग्रेशन 2020 हायलाइट्स' या अहवालात असं म्हटलं होतं की भारतातील 1.8 कोटी लोकसंख्या ही जगभर वास्तवास आहे. यामध्ये सर्वाधिक भारतीय लोकसंख्या ही युएईमध्ये (UAE) वास्तव करते असेही या अहवालाच्या हायलाइट्मध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 3.6 लोकसंख्या ही स्थलांतरीत असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय.

Pravasi Bharatiya Divas 2021: भारतात का साजरा केला जातो 'प्रवासी भारतीय दिवस?' काय आहे या दिवसाचं महत्व?

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget