एक्स्प्लोर

मराठा आरक्षण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं, सिब्बल यांचा युक्तिवाद; पुढील सुनावणी 28 ऑगस्टला

मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करायला हवं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला. तर इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मोठं खंडपीठ हवं, असं मुकुल रोहतगी यांनी म्हटलं.आता या प्रकरणावर 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आता शुक्रवारी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करायला हवं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला. तर इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मोठं खंडपीठ हवं, असं मुकुल रोहतगी यांनी म्हटलं.

पहिल्यांदा युक्तिवाद कोणी करावा यावरुन मुकुल रोहतही आणि कपिल सिब्बल यांच्यात थोडा वाद झाला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमची मुख्य याचिका आहे म्हणून आम्हाला पहिल्यांदा आम्हाला संधी मिळावी, असं मुकुल रोहतगी रोहतगी म्हणाले. कपिल सिब्बल यांनी इंटर्वेनेरच्या वतीने युक्तिवाद केला. तर राज्य सरकारची बाजून मुकुल रोहतगी यांनी मांडली.

कोर्टात आज काय घडलं?

इंद्रा साहनी प्रकरणात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी काही अपवाद असतील असं म्हटलं होतं : मुकुल रोहतगी "मुंबई हायकोर्टाने आपल्या पाचशे पानांपेक्षा अधिक निकालात हे आरक्षण 50 टक्क्यांहून पुढे जाणारं आरक्षण वैध ठरवलं आहे. अनेक राज्यांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण असतानाही केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला ना. 5 ऑगस्ट 2020 रोजी आर्थिक आरक्षणाचं प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे गेलं आहे. 50 टक्क्यांची मर्यादा घटनात्मक तरतूद केंद्राने ओलांडली आहे. इंद्रा सहानी प्रकरणात नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. त्यामुळे या संदर्भातले प्रश्न चर्चा करण्यासाठी त्यापेक्षा मोठं खंडपीठ हवं. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी काही अपवाद असतील असं इंद्रा साहनी प्रकरणात म्हटलं होतं. मराठा आरक्षणाच्या आमच्या केसमध्ये एका निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली अहवाल दिला आहे, त्याच्या आधारे हा निर्णय झाला. केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारची प्रकरण हे एकमेकात गुंतलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची गरज आहे," असं राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टात म्हणाले.

मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं : कपिल सिब्बल   "हे प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं. इंद्रा साहनी प्रकरणात 1931 च्या जनगणनेचा आधार घेतला होता. महाराष्ट्रात 85 टक्के लोकसंख्या ही मागास प्रवर्गातील आहे. त्यामुळे इंद्रा साहनी प्रकरणाचा अडथळा अधिक आरक्षण देण्यासाठी येत नाही. वेगवेगळ्या राज्यातले कायदे जिथे आरक्षण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे ते पण लक्षात घेतले पाहिजेत. कुठल्या जातींना आरक्षण द्यायला हवं याची यादी केंद्राकडे राज्याकडून जाते. जर राज्य एखाद्या घटनात्मक मार्गाने नव्या जातींना आरक्षण देत असेल तर त्याला अवैध का ठरवलं जातं हा विरोधाभास आहे," असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

50 टक्क्यांची मर्यादेला कुठल्या तत्त्वाचा आधार : याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकील नरसिंह  50 टक्क्यांची मर्यादा वारंवार उल्लेखित होत आहे. पण याला कुठल्या तत्त्वाचा आधार आहे? ते केवळ बॅलन्स म्हणून सांगितलं गेलं. पण अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत. त्यामुळे त्याची फेररचना होण्याची गरज आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
Petrol Storage Rules : घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
Narendra Modi : उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Akola News: गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
Ashok Kharat: तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
Marathi Actor Accident:निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
NCP Merger:
"अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमान.., सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करा"; सुनील शेळकेंचं मोठे विधान
Embed widget