एक्स्प्लोर

विनयभंगात महाराष्ट्र अव्वल, वर्षभरात 11,713 विनयभंग!

नवी दिल्ली : महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत असतानाच आता एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानेही या आरोपावर शिक्कामोर्तब केला आहे. महिलावंर सर्वात जास्त अत्याचार होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. एनसीआरबीने 2015 चा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल मंगळवारी जाहीर केला.   उत्तर प्रदेशमध्ये 2015 या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण 35 हजार 527 घटना घडल्या. हा आकडा देशातील एकूण गुन्ह्यांच्या 10.9 टक्के एवढी आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.   विनयभंगाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात!   2015 मध्ये देशभरात विनयभंगाच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार, महिला विनयभंगाचा आकडा 82 हजार 422 एवढा आहे. धक्कादायक म्हणजे विनयभंगाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 11 हजार 713 घटनांची नोंद झाली आहे, तर त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचा (8,049 घटना) क्रमांक लागतो.   सर्वात जास्त महिला अत्याचाराच्या घटना या’ तीन राज्यांमध्ये! उत्तर प्रदेश – 35,527 घटना पश्चिम बंगाल – 33,218 घटना महाराष्ट्र – 31,126 घटना   केंद्रशासित राज्यांमध्ये महिला अत्याचारांत घट   केंद्रशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येनं घटल्याचं एनसीआरबीच्या 2015 च्या अहवालातून समोर आले आहे. लक्षद्विपमध्ये महिला अत्याचाराच्या 9 घटना घडल्या आहेत. केंद्रशासित राज्यांमध्ये 2014 साली महिला अत्याचाराच्या घटनांची 3.37 लाख एवढी नोंद केली गेली होती. या संख्येत घट झाली असून, 2015 साली 3.27 लाख घटनांची नोंद झाली आहे.   बलात्काराच्या घटना :   2015 या वर्षात देशात एकूण 34 हजार 651 बलात्काराच्या घटना घडल्या. 2014 साली 36 हजार 735 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.   सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या’ तीन राज्यांमध्ये! मध्य प्रदेश -  4,391 घटना महाराष्ट्र – 4,144 घटना राजस्थान – 3,644 घटना उत्तर प्रदेश – 3,025 घटना   चिमुकल्यांवरील अत्याचार :   एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2015 या वर्षात POCSO अंतर्गत लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या एकूण 8 हजार 800 घटनांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 3,149 घटनांमध्ये आरोपी हे पीडिताच्या शेजारच्या घरातील असल्याचे आढळले आहेत. तर 10 टक्के आरोपी हे पीडित चिमुकल्यांचे नातेवाईक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.   एनसीआरबी म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2015 च्या अहवालानंतर देशातील गुन्हेगारीचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण विशेष लक्षणीय आहे. याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचीही गरज आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले असून, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.   महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत असताना, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा 2015 चा अहवाल गृहखात्याचे डोळे उघडणारा आहे. त्यामुळे या अहवालाकडे राज्य सरकार किती गांभीर्यानं पाहतं आहे आणि त्याप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी कसे पावले उचलत आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
Pratibha Pawar Sonia Gandhi : प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर, कॅप्शनमध्ये विशेष उल्लेख
प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर, कॅप्शनमध्ये विशेष उल्लेख

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget