एक्स्प्लोर

Lockdown | रेल्वेचे बुकिंग कालपर्यंत का सुरु होतं?

लॉकडाऊनमध्ये अडकेलले मजूर अस्वस्थतेने बाहेर पडत असल्याचं चित्र देशाच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळालं. काल वांद्र्यात घडलेला प्रकार म्हणजे याच माालिकेतला एक प्रकार. पण या सगळ्या प्रकारात या मजुरांना घरी परत जाण्यासाठी ज्या रेल्वेकडून सर्वाधिक आशा होती, त्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊन आणि अडकलेल्या मजुरांचा उद्रेक...20 दिवसांपूर्वी जे चित्र दिल्लीतल्या आनंदविहार बस स्टँडवर पाहायला मिळालं, ते काल वांद्र्यात दिसलं. संचारबंदी झुगारत एकाच वेळी शेकडो लोकांची गर्दी उसळली. वांद्र्यातल्या या गर्दीमागे नेमकं कोण होतं, त्यापाठीमागे काय राजकारण होतं याची उत्तरं तपासात कळतीलच. पण या सगळ्यात प्रश्न उपस्थित होत आहेत ते रेल्वेच्या कारभाराबाबतही.

लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेकडून 15 एप्रिलनंतरच्या प्रवासासाठी बुकिंग चालूच होतं. अगदी काल-परवापर्यंत हे बुकिंग सुरु होतं. 15 एप्रिल ते 3 मे या दरम्यानच्या काळातल्या प्रवासासाठी 39 लाख तिकीटं बुक झाली होती. मग प्रश्न असा आहे की इतक्या लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत आशेवर का ठेवलं गेलं.

अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागात मजूर अडकून पडले. महाराष्ट्रातच अशा अडकून पडलेल्या मजुरांची संख्या सहा लाख इतकी आहे. रेल्वे सुरु होईल आणि आपण घरी जाऊ अशी आशा त्यांना वाटत होती. दिल्लीतल्या आनंदविहारमध्येही हेच मजूर बाहेर पडले, सुरतमध्येही अशाच मजुरांचा उद्रेक बाहेर आला आणि आता वांद्रे. नियोजनात या मजुरांचा विचारच नसल्याने प्रत्येकवेळी तेच असहाय्य दिसत आहेत अशी टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

3 मे पर्यंतची पुढची बुकिंग आता रेल्वे वेबसाईटवर उपलब्ध नाहीत. पुढची सूचना येईपर्यंत ही बुकिंग सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 3 मे नंतरचं चित्र काय असणार हे स्पष्ट नसल्याने रेल्वेने आता ही खबरदारी घेतली आहे. पण मुळात हे कळायला रेल्वेला इतका उशीर झाला. लॉकडाऊनच्या 21 दिवसांत बुकिंग पॉलिसीबाबत काहीच हालचाल का नाही झाली? ज्या मजुरांची सगळी मदार रेल्वेवरच होती, त्या मजुरांचं हित लक्षात घेऊन रेल्वेने वेळीच निर्णय का जाहीर केले नाहीत?

लॉकडाऊन असताना जागच्या जागी थांबायला काय जातंय या मजुरांना अशी कुणाचीही पहिली प्रतिक्रिया असू शकते. पण प्रश्न केवळ अन्न निवाऱ्याचा नाही. दरवर्षी हे परप्रांतीय मजूर या दिवसांत आपल्या गावाकडे जात असतात. गावाकडच्या शेतात नव्या हंगामाची तयारी करुन ते पुन्हा पोटापाण्यासाठी शहरात येतात. मुळात लॉकडाऊनसारखा निर्णय जाहीर करताना इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या या वर्गाचा विचारच झाला नाही हे कटू सत्य आहे.

देशाच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांमध्ये तब्बल 90 टक्के लोक हे दैनंदिन कामावर पोट भरणारे असे मजूर आहेत. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये घरी बसणं हे त्यांच्यासाठी दिव्य आहे. दिल्लीत आनंदविहारमध्ये त्याची झलक दिसलेली असतानाही प्रशासनानं सावध न झाल्याचंच हे लक्षण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget