एक्स्प्लोर

Lockdown | रेल्वेचे बुकिंग कालपर्यंत का सुरु होतं?

लॉकडाऊनमध्ये अडकेलले मजूर अस्वस्थतेने बाहेर पडत असल्याचं चित्र देशाच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळालं. काल वांद्र्यात घडलेला प्रकार म्हणजे याच माालिकेतला एक प्रकार. पण या सगळ्या प्रकारात या मजुरांना घरी परत जाण्यासाठी ज्या रेल्वेकडून सर्वाधिक आशा होती, त्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊन आणि अडकलेल्या मजुरांचा उद्रेक...20 दिवसांपूर्वी जे चित्र दिल्लीतल्या आनंदविहार बस स्टँडवर पाहायला मिळालं, ते काल वांद्र्यात दिसलं. संचारबंदी झुगारत एकाच वेळी शेकडो लोकांची गर्दी उसळली. वांद्र्यातल्या या गर्दीमागे नेमकं कोण होतं, त्यापाठीमागे काय राजकारण होतं याची उत्तरं तपासात कळतीलच. पण या सगळ्यात प्रश्न उपस्थित होत आहेत ते रेल्वेच्या कारभाराबाबतही.

लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेकडून 15 एप्रिलनंतरच्या प्रवासासाठी बुकिंग चालूच होतं. अगदी काल-परवापर्यंत हे बुकिंग सुरु होतं. 15 एप्रिल ते 3 मे या दरम्यानच्या काळातल्या प्रवासासाठी 39 लाख तिकीटं बुक झाली होती. मग प्रश्न असा आहे की इतक्या लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत आशेवर का ठेवलं गेलं.

अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागात मजूर अडकून पडले. महाराष्ट्रातच अशा अडकून पडलेल्या मजुरांची संख्या सहा लाख इतकी आहे. रेल्वे सुरु होईल आणि आपण घरी जाऊ अशी आशा त्यांना वाटत होती. दिल्लीतल्या आनंदविहारमध्येही हेच मजूर बाहेर पडले, सुरतमध्येही अशाच मजुरांचा उद्रेक बाहेर आला आणि आता वांद्रे. नियोजनात या मजुरांचा विचारच नसल्याने प्रत्येकवेळी तेच असहाय्य दिसत आहेत अशी टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

3 मे पर्यंतची पुढची बुकिंग आता रेल्वे वेबसाईटवर उपलब्ध नाहीत. पुढची सूचना येईपर्यंत ही बुकिंग सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 3 मे नंतरचं चित्र काय असणार हे स्पष्ट नसल्याने रेल्वेने आता ही खबरदारी घेतली आहे. पण मुळात हे कळायला रेल्वेला इतका उशीर झाला. लॉकडाऊनच्या 21 दिवसांत बुकिंग पॉलिसीबाबत काहीच हालचाल का नाही झाली? ज्या मजुरांची सगळी मदार रेल्वेवरच होती, त्या मजुरांचं हित लक्षात घेऊन रेल्वेने वेळीच निर्णय का जाहीर केले नाहीत?

लॉकडाऊन असताना जागच्या जागी थांबायला काय जातंय या मजुरांना अशी कुणाचीही पहिली प्रतिक्रिया असू शकते. पण प्रश्न केवळ अन्न निवाऱ्याचा नाही. दरवर्षी हे परप्रांतीय मजूर या दिवसांत आपल्या गावाकडे जात असतात. गावाकडच्या शेतात नव्या हंगामाची तयारी करुन ते पुन्हा पोटापाण्यासाठी शहरात येतात. मुळात लॉकडाऊनसारखा निर्णय जाहीर करताना इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या या वर्गाचा विचारच झाला नाही हे कटू सत्य आहे.

देशाच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांमध्ये तब्बल 90 टक्के लोक हे दैनंदिन कामावर पोट भरणारे असे मजूर आहेत. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये घरी बसणं हे त्यांच्यासाठी दिव्य आहे. दिल्लीत आनंदविहारमध्ये त्याची झलक दिसलेली असतानाही प्रशासनानं सावध न झाल्याचंच हे लक्षण आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Chhatrapati Sambhajinagar: जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
Embed widget