एक्स्प्लोर

EWS Reservation: EWS आरक्षणाचे निकष काय? कोणाला मिळणार फायदा, जाणून घ्या

EWS Reservation: आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी असलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने योग्य ठरवले आहे. या निर्णयाने EWS आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

EWS Reservation: सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आज ऐतिहासिक निकाल देताना आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठीचे आरक्षण (Economically Weaker Sections Reservation) वैध ठरवले. या निर्णयामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारने 103 वी घटनादुरुस्ती करत EWS आरक्षण लागू केले होते. या आरक्षणामुळे सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.  

EWS आरक्षणाचे निकष काय? 

केंद्र सरकारने या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठीच्या आरक्षणासाठी निकष निश्चित केले (Economically Weaker Section reservation eligibility) आहे. या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी आदी आरक्षित प्रवर्गाला घेता येणार नाही. या आरक्षणासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना होणार आहे. 

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा व्यक्तींना EWS  आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.  या आरक्षणासाठी संबंधित कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन असावी. त्याशिवाय,  900 चौरस फुटांपेक्षा कमी आकाराचे घर असावे. या निकषांनुसार EWS आरक्षण देण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी 10 टक्के जागा आरक्षित असणार आहे. 

घटनापीठात मतभिन्नता

सुप्रीम कोर्टात EWS आरक्षणाच्या वैधतेबाबत पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या घटनापीठाच्या निकालात मतभिन्नता दिसली. सरन्यायाधीस उदय लळीत आणि न्या. भट यांनी आर्थिकदृष्ट्या आरक्षण घटनाबाह्य असल्याचे म्हटले. तर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. बेला त्रिवेदी, न्या. पराडीवाला यांनी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. या आरक्षणामुळे घटनेच्या मूलभूत उद्दिष्टांचे उल्लंघन होत नसल्याचे म्हटले. आरक्षण हे एक साधन असल्याचे सांगितले. आरक्षण हे अनिश्चित काळासाठी ठेवू नये. आर्थिकदृष्ट्या आरक्षणाची तरतूद योग्य असल्याचे न्या. पराडीवाला यांनी म्हटले. न्या. रविंद्र भट यांनी आपल्या निकालात आर्थिक आरक्षणाच्या तरतुदीला विरोध केला. त्यांनी म्हटले की, हे आरक्षण राज्यघटनेशी सुसंगत नाही. सामाजिक न्याय आणि घटनेच्या मूळ गाभ्याला या निर्णयाने धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget