एक्स्प्लोर

JawaharlalNehru: ...तेव्हा नेहरुंनी स्वतः विरोधातच लिहिला लेख

नेहरू एक व्यक्ती नाही, तर एक विचारधारा आहे. जोपर्यंत हा देश अस्तित्वात आहे, तोपर्यंत नेहरुंचे नाव घ्यावेच लागेल इतकं महान काम त्यांनी करुन ठेवलं आहे.

मुंबई : अलाहाबादमध्ये 14 नोव्हेंबर 1889 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांचा जन्म झाला. तर 27 मे 1964 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यानंतरही जग नेहरुंना विसरू शकले नाही. कारण, नेहरू एक व्यक्ती नाही, तर एक विचारधारा आहे. आधुनिक भारताचे निर्माते नेहरुंची विचारधारा आजही जीवंत आहे. म्हणूनच प्रसिद्ध कवी साहिर लुधियानवी यांनी नेहरुंना आदरांजली वाहताना म्हटले आहे... जिस्म की मौत कोई मौत नहीं होती है जिस्म मिट जाने से इंसान नहीं मर जाते धड़कनें रुकने से अरमान नहीं मर जाते सांस थम जाने से एलान नहीं मर जाते होंट जम जाने से फ़रमान नहीं मर जाते जिस्म की मौत कोई मौत नहीं होती है 20 व्या शतकातील महान नेते विस्टन चर्चिल, फ्रान्सचे राष्ट्रपती चार्ल्स डी गॉल, रशियाचे जोसेफ स्टालिन, लोकप्रीय राष्ट्रपती जॉन एफ केनेडी, चीनचे हुकूमशहा माओत्से तुंग यांच्या तुलनेत बौद्धिक पातळीवर नेहरू नेहमीच श्रेष्ठ आहेत. त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि मानवतावादी प्रतिमा यांच्यापेक्षा मोठी आहे. नेहरू जरी देशाचे पंतप्रधान होते, तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच होते. 1951 साली राष्ट्रसंघाच्या परिषदेत त्यांनी दिलेल्या एका भाषणावरुन त्याचा प्रत्यय येतो. "मी केवळ पंतप्रधान नाही, तर त्यापेक्षा अधिक आहे, मी माणूस आहे, कायम स्वतःत सुधारणा करण्यासाठी स्वतःशीच संघर्ष करत असतो, माणसांन कसं असायला हवं, याचाच विचार मी नेहमी करतो, यातून नेहरुंमधला माणुस आपल्याला पाहायला मिळतो". नेहरुंच्या कार्यकाळात सुरु झालेल्या IIT, IIM, NID, अणूऊर्जा प्रकल्प, ISRO यामुळे जगभरात भारताची ओळख आहे. मात्र, राजकारणात त्यांच्यावर अनेकवेळा टीका झाली. आजही नेहरुंना टार्गेट केलं जातं. मात्र, त्यांनी हयात असताना सर्वांचे विचार ऐकून घेतले. या त्यांच्या व्यक्तीमत्वावर सरोजनी नायडू यांनी पत्रातून लिहिले होते की, ''तुम भाग्य पुरुष हो, जो भीड़ के बीच भी अकेला रहने के लिए जन्म लेता है. जिसे लोग बेहद प्यार करते हैं, लेकिन समझते कम लोग हैं.'' नेहरुंकडे असलेलं ज्ञान हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. त्यांनी 'द डिस्कवरी ऑफ इंडिया', 'ग्लिमप्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' आणि बायोग्राफी 'टुवर्ड फ्रीडम' अशी पुस्तके लिहली. ते विद्वानांसाठी महापंडित, तत्वज्ञांसाठी महान तत्वज्ञ, शास्त्रज्ञानांसाठी कुशल शास्त्रज्ञ आणि साहित्य आणि राजकारणातील कुशल पंडित होते. नेहरू एक व्यक्ति नाही तर विचारांचा मेळा होता. वैचारिक मतभेद - देशाच्या स्वातंत्र्य लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेहरुंची आधुनिक भारत निर्माण करण्यातही मोठं योगदान आहे. याकाळात आपल्याच सहकाऱ्यांसोबत त्यांचे अनेकदा वैचारिक मतभेद झाले. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेकांसोबत नेहरुंचे विचार पटले नाहीत. मात्र, याचा परिणाम कधीच त्यांच्या वैयक्तीक नात्यावर झाला नाही. स्वतः विरोधात लिहला लेख - एकदा नेहरू त्यांचा जयजयकार ऐकून इतके कंटाळले होते, की 195 7 मध्ये त्यांनी स्वत:च्या विरुद्ध मॉडर्न टाइम्समध्ये 'द राष्ट्राध्यक्ष' या नावाने एक जबरदस्त लेख लिहिला. या लेखात त्यांनी नेहरूंच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरूद्ध वाचकांना इशारा दिला. ते म्हणाले, नेहरुंना इतकंही बळ देऊ नका, की त्यांचा सीझर होईल. जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा नेहरुंसमोर अनेक आव्हाने होती. ते काहींमध्ये अपयशी ठरले. परंतु, त्यांचा उद्देश देशाच्या प्रगतीबद्दल नेहमीच प्रामाणिक होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Donald Trump Strait Of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, ज्या देशांनी त्या मार्गाची...
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, ज्या देशांनी त्या मार्गाची...
Donald Trump On Israel Iran US War मोठी बातमी: इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली; आखाती युद्धात अमेरिकेचा विजय, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
मोठी बातमी: इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली; आखाती युद्धात अमेरिकेचा विजय, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

व्हिडीओ

Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat: अशोक खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी; सुरक्षेसाठी VC द्वारे सुनावणी, वकिलांचा न्यायालयात खळबळजनक युक्तिवाद
अशोक खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी; सुरक्षेसाठी VC द्वारे सुनावणी, वकिलांचा न्यायालयात खळबळजनक युक्तिवाद
Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Embed widget