एक्स्प्लोर

India Attack On Pakistan : अखेर युद्ध पेटलं... पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निकामी, भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव, नौदलाचा कराचीवर हल्लाबोल

India Attack On Pakistan : पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतानेही त्याला जशास तसं उत्तर दिलं असून इस्लामाबादमध्ये मोठा धमाका झाल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला करून घेतला आहे. एकाचवेळी भारतीय लष्कर, वायू दल आणि नौदलाने पाकिस्तानवर हल्ला करुन पाकिस्तानची वाताहत केल्याचं दिसून आलं. आधी पाकिस्तानने जम्मू आणि इतर तीन शहरांवर ड्रोन हल्ले केले. त्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली. भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह 16 शहरांवर एकाचवेळी हल्ला केला. तर INS Vikrant ने कराची बंदरावर हल्लाबोल केला. दुसरीकडे भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्यांच्या तळांना लक्ष्य केलं (India Attack On PoK). 

आधी पाकिस्तानचा भारतावर हल्ला

ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindhoor) बिथरलेल्या पाकिस्तानने आगळीक केली असून त्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला (Pakistan Attack On India) केला.  पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट (Blackout) करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय (India Air Defence System) झाली. 

पाकिस्तानचे सगळे ड्रोन निकामी

भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडण्याची कामगिरी केली. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर आली. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर (India Attack On Lahor Islamabad) क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. 

गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं. 

India Attack On PoK : पाकव्याप्त काश्मीरवर भारताचा हल्ला

एकीकडे इस्लामाबादसह 16 शहरांवर हल्ला केल्यानंतर भारताने त्याचा मोर्चा पाकव्याप्त काश्मीरकडे वळवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कारवाई सुरू केली असून पाकिस्तानी लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

India Attack On Islamabad : भारताचा इस्लामाबाद आणि लाहोरवर हल्ला

पाकिस्तानच्या आगळीकतेला भारताने आता प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तानवर हल्ला सुरू केला. पाकिस्तानच्या भागात त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीवर हल्ला केल्यानंतर तो हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने निकामी केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आधी लाहोरवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य करत हल्ला केला. 

भारताच्या हल्ल्यानंतर इस्लामाबाद हादरले असून शहरात कानठळ्या बसणारे आवाज ऐकू येत होते. इस्लामाबादमध्ये मोठा धमाका झाल्याची माहितीही समोर येत आहे. 

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा धमाका, नागरिकांची धावपळ

भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरात हल्लाबोल केला असून पेशावर शहरात मोठा धमाका झाल्याची बातमी आहे. पेशावरमध्ये झालेल्या धमाक्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

India Attack On Pakistan : भारताचा पाकिस्तानच्या 16 शहरांवर हल्ला

भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह लाहोर, सियालकोट सारख्या 16 शहरांवर हल्ला केला आहे. एकीकडे वायू दलाचा आणि लष्कराचा हल्ला तर दुसरीकडे नौदलानेही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तुर्कीचे कार्गो विमान कराचीत, ड्रोन पुरवल्याची शक्यता

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन मदत पाठवल्याचा दावा केला जात असला तरी भारत विरोधी लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती आहे. एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय.

पाकिस्तानमध्ये ब्लॅकआऊट

भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्ण अंधारात गेलं आहे. तसेच इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. 

Pakistan Govt Vs Army : पाकिस्तान सरकार आणि लष्कर आमनेसामने

पाकिस्तानवर भारताने हल्ला केल्यानंतर आता त्या ठिकाणी अनागोंदी पसरण्याची शक्यता आहे. भारतीय आक्रमणाला पाकिस्तान तोंड देऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच पाकिस्तानी लष्कर आणि सरकार आता सामने-सामने आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे बंकरमध्ये लपल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. 

Asim Munir : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ताब्यात, देशद्रोहाचा खटला चालणार

पहलगाम हल्ला करुन पाकिस्तानवर युद्धाची वेळ आणल्याची किंमत लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir Arrested) याला चुकवावी लागणार आहे. असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी होणार आहे. असीम मुनीरच्या जागी आता शमशाद मिर्झा यांची नियुक्ती होणार आहे. तसेच असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा खटला चालवण्यात येणार आहे.  

Imran Khan Update : इम्रान खान यांना सोडा अन्यथा जेल तोडू, समर्थक रस्त्यावर

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचं दिसून येतंय. आधी लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आता इम्रान खान यांना सोडण्याची मागणी त्याच्या समर्थकांनी केली. पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरले असून इम्रान खान कैद असलेलं अडिया जेल फोडण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याची माहिती आहे. सोशल मीडियात इम्रान समर्थकांनी मोठं कॅम्पेन सुरू केलं आहे. 

INS विक्रांतचा कराची बंदरावर हल्ला

वायूदलाच्या स्ट्राईकनंतर भारताने समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी केली. आयएनएस विक्रांतवरून पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर 10 पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यामुळे कराचीमध्ये एकच गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. याआधी 1971 मध्ये भारतीय नौसेनेने कराची बंदर नेस्तनाबूत केलं होतं. 

Balochistan Attack : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला

एकीकडे भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये बलोच लिबरल आर्मीने (Balochistan Liberation Army) आक्रमक भूमिका घेतली आहे. बलोच लिबरल आर्मीने पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ला केला. पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये बलोच आर्मीकडून पाकिस्तानी सैनिक निशाण्यावर आले. कंबरानी रोड जंगल बाघ परिसरात हा हल्ला केला. क्वेट्टामध्ये पाक सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करण्यात आला. बलुचिस्तान परिसरात पाक सैन्याच्या अनेक कॅम्पवर बलोच आर्मीचे हल्ले केले आहेत.

पूंछ सेक्टरमध्ये एलओसीवर भारत-पाकिस्तान सेना आमनेसामने

एकीकडे भारताने पाकिस्तानमध्ये घुसून त्याला नामोहरम केलं तर दुसरीकडे भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याला निशाणा केलं. पूंछ सेक्टरमध्ये एलओसीवर भारत-पाकिस्तान सेना आमनेसामने आले असून दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. आधी पाकिस्तानने गोळीबाराला सुरुवात केली. तर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. 

कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानचा दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न

भारताच्या तीनही दलांनी कोंडी केल्यानंतर अडचण झालेल्या पाकिस्तानची आगळीक काही संपली नाही. कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानने आता त्यांचे दहशतवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न केला. जैश ए महम्मदचे 12 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. त्यापैकी सात दहशतवाद्यांना बीएसएफने कंठस्नान घातलं. 

बलुचिस्तानचा एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा

भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालं आहे. कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने (Balochistan Liberation Army BLA) पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे. बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. ही घटना म्हणजे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याकडे एक पाऊल असल्याची चर्चा आहे. 

भारत पाकिस्तान वादात सौदी अरेबियाची एन्ट्री

भारत-पाकिस्तान तणावात सौदी अरेबियाची एन्ट्री होणार आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री शुक्रवारी इस्लामाबादला जाणार आहेत. भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर या भागात शांतता राहण्यासाठी सौदी अरब हा देश पाकिस्तानला समजवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादामुळे त्या देशावर ही परिस्थिती आली आहे. त्यामुळे सौदी अरबने समजवल्यानंतर तरी पाकिस्तान सुधारतो का याकडे लक्ष लागलं आहे. 

अजून तणाव वाढवू नका, अमेरिकेची पाकिस्तानला तंबी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं असून इस्लामाबाद ते कराचीपर्यंत स्ट्राईक केले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. अजून तणाव वाढवू नका, असं अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावलं आहे. 

जम्मूमध्ये ड्रोन हल्ले कुठे झाले?

पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणांमध्ये जम्मू विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि जम्मूला लागून असलेला सीमावर्ती भाग आरएस पुरा यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले.

 

पाकिस्तानची आगळीक सुरूच

पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आणि नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन सीमाभागात गोळीबार केला. तसेच भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम निकामी केली. त्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. परिणामी पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तरीही पाकिस्तानने आता पुन्हा आगळीक केली आणि जम्मूवर ड्रोन हल्ला केला.

भारताने अनेक ड्रोन पाडले

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताची एस 400 ही डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली असून त्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूमध्ये नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती समोर आली नाही. पण भारताकडून ते सर्व ड्रोन पाडण्याची कारवाई सुरू आहे.

विमानतळ लक्ष्य होतं

जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर आली आहे. जम्मूच्या विमानतळाच्या दिशेने जवळपास आठ ड्रोन येत होते. पण ते सर्वच ड्रोन हवेतच पाडण्यास भारताला यस आलं आहे. 

राजस्थानमध्येही ब्लॅकआऊट

जम्मूनंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागातही ब्कॅकआऊट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सक्रिय झालं आहे.  

भारताने पाकिस्तानची दोन JF 17 विमाने पाडली

भारताने पाकिस्तानची दोन JF 17 विमाने पाडली असून तशी कबुली पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. पाकिस्तानचा संवादाच्या माध्यमावर विश्वास असून आम्हाला शांती हवी आहे अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली. पाकिस्तानचे हे विमान राजस्थानमध्ये पाडण्यात आलं असून त्याचे अवशेष लष्कराच्या हाती लागली आहेत. भारताशी कुरापत करण्याच्या प्रयत्नामुळे पाकिस्तानने दोन विमाने गमावली. JF 17 विमाने ही चीनने पाकिस्तानला दिली होती. 

लाल रंगाचे गोळे हवेतच नष्ट केले

पाकिस्तानने भारताच्या दिशेने पाठवलेले ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. आकाशातून जमिनीच्या दिशेने येणारे लाल रंगाचे गोळे हे तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. भारताची एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाल्यानंतर सर्व डोन हे हवेतच पाडण्यात आले. 

भारताचे नौदल आक्रमणाला सज्ज

एकीकडे भारतीय वायूदलाने आणि लष्कराने पाकिस्तानला उत्तर दिल्यानंतर दुसरीकडे भारतीय नौदल आता आक्रमणासाठी सज्ज झालं आहे. भारतीय नौदल अरबी समुद्रात सज्ज झालं असून पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. 

अमेरिकेची मध्यस्ती करण्याची तयारी 

भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यूएस सेक्रेटरी मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. परिस्थिती चिघळू देऊ नका असं आवाहन अमेरिकेने केले. तसेच भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. 

आयपीएलचा सामना रद्द

धरमशालामध्ये सुरू असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द करण्यात आला आहे. पाकच्या ड्रोन, मिसाईल हल्ल्याच्या प्रयत्नामुळे सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे स्टेडिअममधील फ्लडलाईट्स आधी बंद करण्यात आले. त्यानंतक बीसीसीआयकडून सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. 

दिल्ली विमानतळाने सूचना जारी केल्या

दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे. बदलत्या हवाई परिस्थिती आणि कडक सुरक्षेमुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना नवीनतम अपडेटसाठी त्यांच्या एअरलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Shambhuraj Desai Satara ZP Election: साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Embed widget