एक्स्प्लोर

India-China Face Off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम : पंतप्रधान

गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही देताना आम्हाला डिवचलं तर जशास तसं उत्तर देण्यास सक्षम असल्याचं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच आम्हाला डिवचलं तर आम्हीही जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसंच सर्व शहीद जवानांना दोन मिनिटं मौन बाळगून आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की, "आम्ही कायमच आमच्या शेजारील देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली. त्यांच्या भल्यासाठी प्राथर्ना केली. आम्ही कधीच कोणत्या देशाला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही. मतभेद कधीच वाद होऊ दिले नाहीत. भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत. भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही."

"जेव्हा कधी  संकटं आली आहेत, तेव्हा देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. त्याग आणि तितिक्षा आमच्या राजकीय चरित्राचा वाटा आहे. विक्रम आणि वीरताही देशाच्या चरित्राचा वाटा आहे. देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. याबाबत कुणाच्या मनातही जरासाही भ्रम किंवा संशय असायला नको. भारताला शांतता हवी आहे. पण भारताला डिवचल्यावर कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे. आमच्या शहीद वीर जवानांचा देशाला अभिमान आहे. शत्रूला मारता मारता जवान शहीद झाले," असं पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

India-China Border Dispute | पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे सवाल

भारत-चीन सीमेवर हिंसक झडप भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.

भारत-चीन वाद नेमका काय आहे? लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्याने वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.

संबंधित बातम्या

India-China Border Tension गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण, भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारले गेल्याची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
LPG Crisis : घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरचा खरचं तुटवडा आहे का? सरकारकडे किती साठा शिल्लक? महत्वाची माहिती समोर 
LPG Crisis : घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरचा खरचं तुटवडा आहे का? सरकारकडे किती साठा शिल्लक? महत्वाची माहिती समोर 
Live Blog Updates:मोठी बातमी! नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय
Live Blog Updates: मोठी बातमी! नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय

व्हिडीओ

Sushma Andhare On Rupali Chakankar यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी
Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
Embed widget