एक्स्प्लोर

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था रामभरोसे! डॉक्टर, नर्सेसच्या अनेक जागा रिक्त

India Rural Health Care : देशातील ग्रामीण आरोग्य भागात डॉक्टर, नर्सेससह इतर अनेक जागां रिक्त आहेत. याच्या परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.

India Rural Health Care :  भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्य करते असे म्हटले जाते. कोरोना महासाथीच्या काळात या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्यात. देशातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीच्या घोषणा होत असल्या तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 

मागील अनेक वर्षांपासून भारताने ग्रामीण आरोग्य सेवा केंद्रांमध्ये रिक्त पदे भरलेली नाहीत. प्रत्येक ग्रामीण आरोग्य क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी 2021 च्या ताज्या अहवालानुसार, दीड दशकांपूर्वीच्या तुलनेत ग्रामीण आरोग्यासाठी मनुष्यबळाची गरज आणखी वाढली आहे.

ग्रामीण भागात 68 टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. सन 2005 पासून आतापर्यंत रिक्त पदात 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रात सर्जन,फिजिशियन, बालरोगतज्ञ तसेच प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ या तज्ज्ञांच्या जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागात 9000 तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. 

ग्रामीण भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष 2005 मध्ये 7582 पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 3550 जागा भरण्यात आल्यात. तर, 4032 जागा रिक्त होत्या. तर, 2021 मध्ये 13637 पदांवर भरतीसाठी मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 4405 जागा भरण्यात आल्यात. तर 9232 जागा रिक्त आहेत. याचाच अर्थ जवळपास 68 टक्के जागा आहेत. 

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या रिक्त पदात वाढ झाली आहे. सन 2005 मध्ये 17 टक्के जागा रिक्त होत्या. तर 2021 मध्ये हे प्रमाण 21 टक्के झाले आहे. 

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसाठी वर्ष 2005 मध्ये 24,476 पदे मंजूर करण्यात  आली होती. त्यापैकी 20,308 जागा भरण्यात आल्यात. तर 2021 मध्ये 40,143 जागा मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी 31,716 जागांवर डॉक्टरांची भरती करण्यात आली. 

प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका, मदतनीसांच्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2005 मध्ये 1,39,798 पदांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 1,33,194 जागांवर भरती करण्यात आली. 2021 मध्ये 2,68,913 पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 2,14,820 जागांवर भरती करण्यात आली आहे. 54,093 जागा रिक्त आहेत. 

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात परिचारिका पदासाठीही अनेक जागा रिक्त आहेत. सन 2005 मध्ये 34,061 जागांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी 5,131 जागा रिक्त राहिल्यात. तर 2021 मध्ये 1,06,725 जागांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 27,681 हजार जागा रिक्त आहेत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget