एक्स्प्लोर

India Corona Updates : कोरोनाचं संकट अधिक गडद; काल एकाच दिवसात रुग्णसंख्येत 12 टक्क्यांनी वाढ

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

India Coronavirus Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसाआधी देशात 41,965 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 509 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 35,181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद केरळ राज्यात करण्यात येत आहे. केरळात कोरोना संसर्गामुळं बुधवारी 32,803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात एकूण 40 लाख 90 हजार 36 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 20,961 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

भारतातील एकूण परिस्थिती 

भारतात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 28 लाख 57 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 89 हजार रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत. 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 28 लाख 57 हजार 937
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 20 लाख 28 हजार 825
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 89 हजार 583
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 529
एकूण लसीकरण : 66 कोटी 30 लाख 37 हजार लसीचे डोस

राज्यात काल (बुधवारी) 4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 183 रुग्णांचा मृत्यू

राज्यात काल (बुधवारी)  4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 430  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 77 हजार 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 03 टक्के आहे. 

राज्यात काल (बुधवारी) 183 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 40 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 078 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 091 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (51), नंदूरबार (2),  धुळे (23), जालना (17), परभणी (44), हिंगोली (59),  नांदेड (26),  अमरावती (97), अकोला (22), वाशिम (3),  बुलढाणा (48), यवतमाळ (12), नागपूर (76),  वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (2),  गडचिरोली (31) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

मालेगाव, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, वाशिम,  या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 41,54,890 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,69,332 (11.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,901,427 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,071  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,950 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3187 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1479 दिवसांवर गेला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget