एक्स्प्लोर

Amit Shah : तरुणांनी खेड्याकडं जावं, अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत स्वयंपूर्ण होणार नाही : अमित शाह

अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत कदापी स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होणार नसल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं.

Amit Shah : ग्रामविकासाला गती देऊन, देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत कदापी स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होणार नसल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं. ग्रामविकास साधून गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समृद्धीकडे नेल्याशिवाय भारत आत्मनिर्भर होणार नसल्याचे ते म्हणाले. गुजरातमधील ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA) च्या 41 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात शाह सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. तरुणांनी खेड्याकडे जावं असं आवाहन देखील अमित शाह यांनी यावेळी केलं.

भारताचा आत्मा खेड्यात

भारताचा आत्मा खेड्यात राहतो. म्हणून जर भारताला समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण करायचे असेल तर आधी खेड्यांना समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे महात्मा गांधीजी म्हणत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके याच दिशेने प्रयत्न सुरु केले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते काम प्रत्यक्षात होऊ लागल्याचे शाह म्हणाले. मोदीजींनी देशाला आणि जगाला ग्रामविकासाची एक नवी दृष्टी दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या आठ वर्षांत व्यक्तीच्या, गावाच्या आणि प्रदेशाच्या विकासासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पूर्वी 60 कोटी लोकांचे बँकेत खातेही नव्हते आणि ते अर्थव्यवस्थेशी जोडलेही गेले नव्हते. आज मात्र गेल्या आठ वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे बँकेत खाते नसलेले असे एकही कुटुंब नसेल असे शाह यांनी सांगितलं. पूर्वांचलच्या अनेक कुटुंबांना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही वीजदेखील मिळालेली नव्हती. प्रत्येक घराला वीजपुरवठा करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी सुरु केल्याचे शाह म्हणाले.


Amit Shah : तरुणांनी खेड्याकडं जावं, अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत स्वयंपूर्ण होणार नाही : अमित शाह

जनतेचे  स्वास्थ्यपूर्ण जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न

प्रत्येक घरात शौचालय असण्याची किमान गरजही पूर्वी भागत नसे. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केले आणि आज प्रत्येक घरात शौचालय आहे. प्रत्येक घरी फ्ल्युओराइडविरहित शुद्ध पाणी नळाने पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मोदीप्रणीत सरकारने प्रत्येक गरीब घराला स्वयंपाकाचा गॅसही उपलब्ध करुन दिला आहे. याबरोबरच, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटी गरिबांना आरोग्यकार्ड देऊन 5 लाखांपर्यंच्या आरोग्यसुविधा पुरवल्या आहेत. जीवन स्वास्थ्यपूर्ण करण्यासाठी आणि जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीप्रणीत सरकरने अनेक प्रयत्न केल्याचे शाह म्हणाले. 


Amit Shah : तरुणांनी खेड्याकडं जावं, अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत स्वयंपूर्ण होणार नाही : अमित शाह

पंतप्रधानांचे खादी ग्रामोद्योगाला प्राधान्य
 
गांधीजींनंतर खादीचा विसरच पडला होता, परंतु आता पंतप्रधानांनी प्राधान्य दिल्यामुळं खादी ग्रामोद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शेतीला स्वयंपूर्ण केल्याखेरीज गावांचा संपूर्ण विकास शक्य नाही. हे लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना कर्जे घ्यावी लागणार नाहीत, याचीही काळजी मोदीजींनी घेतली आहे. 75 टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरांपेक्षाही कमी जमीन आहे आणि दोन एकर जमीन कसण्याचा पिकवण्याचा किमान खर्च सहा ते सात हजाराच्या घरात जातो. हे लक्षात घेऊन मोदीजींनी एक व्यवस्था बसवली. त्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी 6,000 रुपये वितरित केले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार नाही. असेही शाह म्हणाले. शेती स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकरी उत्पादन वाढवतील, परंतु विपणनासाठी सहकारी संस्था हा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच, पंतप्रधान मोदीजींनी सहकार मंत्रालय स्थापन केले. देशाच्या ग्रामविकासात हे मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावेल आणि वेगाने ग्रामीण विकास घडून येईल असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.


Amit Shah : तरुणांनी खेड्याकडं जावं, अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत स्वयंपूर्ण होणार नाही : अमित शाह

डॉ. वर्गीस कुरियन यांच्या आठवणींना उजाळा

डॉ. वर्गीस कुरियन यांच्या आठवणींना अमित शाह यांनी उजाळा दिला. कुरियन यांनी ग्रामस्थांच्या शाश्वत, परिस्थितीला अनुकूल, समानशील, अशा सामाजिक-आर्थिक विकासाची संकल्पना मनात धरुन ही संस्था स्थापन केली. तुम्हाला आयुष्यात जेव्हा जेव्हा काही मिळेल, तेव्हा तेव्हा त्याची परतफेड करण्याचेही उद्दिष्ट मनात बाळगा असा सल्लाही शाह यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र

व्हिडीओ

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget