एक्स्प्लोर

Gyanvapi Case: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी; जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करू: सर्वोच्च न्यायालय

Vishwanath Gyanvapi Controversy: काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.

Vishwanath Gyanvapi Controversy: काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. मशिदीच्या आवारात सापडलेल्या शिवलिंगाची पूजेच्या मागणीवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणी जे काही बोलायचे आहे ते वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात बोलावे.

सर्वोच्च न्यायालयात आज अंजुमन इंतझामिया मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी 18 मे रोजी झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण खटला दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयातून जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशात न्यायालयाने असेही म्हटले होते की, जिल्हा न्यायाधीशांनी आधी मशीद समितीच्या अर्जावर सुनावणी घ्यावी. ज्यामध्ये न्यायालयाने हिंदू बाजूची याचिका सुनावणीसाठी अयोग्य असल्याचे म्हटले होते.

अंजुमन इंतझामिया व्यतिरिक्त आज सर्वोच्च न्यायालयात आणखी 3 याचिकांवर सुनावणी झाली. यामध्ये वेगवेगळ्या हिंदू पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकांचा समावेश आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने आधी मशिदीच्या बाजूचे वकील हुजैफा अहमदी यांचा युक्तिवाद ऐकला. अहमदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात कारवाई सुरू आहे. सध्या देखभाल संदर्भातील मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे.

पुढील सुनावणी ऑक्टोबरमध्ये

हुजैफा अहमदी पुढे म्हणाले की, त्यांनी या प्रकरणात न्यायालयाच्या आयुक्तांच्या नियुक्तीलाही आव्हान दिले आहे. आयुक्तांची नियुक्ती आणि मशिदी परिसराचे सर्वेक्षण करण्याची पद्धत चुकीची होती. अहमदी म्हणाले की, या संदर्भात दिवाणी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यावर खंडपीठाने असा प्रस्ताव दिला की, ते वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनाही या बाजूचे सुनावणी करण्यास सांगू शकतात. परंतु उच्च न्यायालयाने ते ऐकून फेटाळून लावल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते ऐकून घ्यावे, असा अहमदी यांचा आग्रह होता. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावर भाष्य केले नाही. वाराणसी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. अशा परिस्थितीत आता या प्रकरणाच्या कोणत्याही पैलूवर त्यांचे म्हणणे ऐकणे योग्य होणार नाही. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी पुढे ढकलण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवर युक्तिवाद ऐकण्यास न्यायालयाने दिला नकार

यानंतर सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागणारे याचिकाकर्ते राजेश मणी त्रिपाठी यांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयात सुनावणी प्रलंबित असताना तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका कशी करू शकता? दिवाणी खटल्याच्या सुनावणीची प्रक्रिया सुरु आहे. अशातच आता आपण याचिका मागे घेतल्यास चांगले. यानंतर वकील हरिशंकर जैन यांनी अमिता सचदेव, पारुल खेडा यांच्यासह सात महिलांच्या वतीने शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी केली. पण न्यायाधीशांनी त्यांना असे सांगितले की, अशा प्रकारे थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही. त्यांनी या गोष्टी कनिष्ठ न्यायालयात मांडाव्यात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget