एक्स्प्लोर

Goa Lockdown : गोव्यात 5 दिवसांच्या लॉकडाऊननंतर 8 दिवसांसाठी कठोर निर्बंध; काय सुरु, काय बंद?

Goa Lockdown : गोव्यात आजपासून लॉकडाऊन नाही मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी असणार कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. सकाळी 7 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार आहेत. तसेच निर्बंध न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

Goa Lockdown : देशातील सर्वात लहान राज्य असणाऱ्या गोव्यामध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या वर्षी गोव्यामध्ये कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नव्हता. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं गोव्यातील परिस्थितीही बिकट झाली आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णयही प्रशासनाला घ्यावा लागला. लॉकडाऊनचं पर्व संपल्यानंतर आता मात्र गोव्यात लॉकडाऊन नसून कठोर निर्बंध लादण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तसेच लॉकडाऊनंतर आता गोव्यात आठ दिवसांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. 

गोव्यात 8 दिवसांसाठी कठोर निर्बंध 

मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, पुढच्या सोमवारपर्यंत गोव्यात काही निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये कसिनो, शाळा, साप्ताहिक बाजारपेठा बंद असणार आहेत, तर मासळी बाजारही केवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु असणार आहेत. याव्यतिरिक्त बारदेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. तर रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्याचसोबत धार्मिक स्थळांवर जाण्यासही परवानगी नसणार आहेत. स्पा, सलून, सिनेमागृह काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

काय सुरु, काय बंद? 

लग्नसमारंभांसाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही परवानगीही कलेक्टर्सच्या परवानगीनंतर देण्यात येईल. सोशल डिस्टंसिंगचही पालन करणं अनिर्वाय असणार आहे. यासाठीही निर्देश जारी करण्यात आले आहेत. कठोर निर्बंधांबाबत सांगण्यात आलं आहे की, राज्यात राजकीय सभांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. दरम्यान, गोव्यात हे निर्बंध 10 मेपर्यंत लागू असणार आहेत. त्यानंतर हे निर्बंध आणखी कठोर करायचे की, शिथील करायचे, यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.  

गोव्यातील कोरोना स्थिती 

गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 2 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 54 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. चिंतेची बाब म्हणजे, गोव्यातील संसर्ग होण्याचा दर अधिक आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती, परंतु, मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rane VS Rane : कणकवलीतलं राजकीय महाभारत! कोण कौरव, कोण पांडव? Special Report
Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील
Pune Senior Citizen  : समाजकल्याण विभागाच्या आश्वासनानंतरही संचालकाने वृद्धांना आणलं रस्त्यावर
Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला
Mahapalikecha Mahasangram Nashik : काय आहेत नाशिकमधील उद्योजकांच्या अपेक्षा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Home Buying Preparation : घर खरेदी करण्याचा विचार करताय? गृहकर्ज, डाऊनपेमेंट अन् ईएमआय, या गोष्टी लक्षात ठेवा
घर खरेदी करण्याचा विचार करताय? गृहकर्ज, डाऊनपेमेंट अन् ईएमआय, या गोष्टी लक्षात ठेवा
Embed widget