एक्स्प्लोर

Go First flights: 'गो फर्स्ट' जमिनीवरच! 9 मे पर्यंतची सर्व विमान उड्डाणे रद्द, प्रवाशांना मनस्ताप

Go First flights Cancelled: गो फर्स्ट एअरलाइन्सने 9 मेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. उड्डाणं रद्द केल्यानंतर डीजीसीएने गो फर्स्टला प्रवाशांचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे आदेश दिले आहेत.

Go First Flights: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट (GoFirst) एअरलाइन्सने आता 9 मेपर्यंत आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एअरलाइन्सने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ऑपरेशनल कारणांमुळे गो फर्स्टने (GoFirst) 9 मे 2023 पर्यंतची आपली उड्डाणं रद्द केल्याचं म्हटलं आहे. उड्डाणं रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल विमान कंपनीने खेद व्यक्त केला आहे. एअरलाइन्सने म्हटले आहे की, प्रवाशांना मूळ पेमेंट मोडद्वारे रकमेचा पूर्ण परतावा लवकरच दिला जाईल.

गो फर्स्टने (GoFirst) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आल्यामुळे तुमच्या प्रवास नियोजनावर परिणाम झाला आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे सहाय्य करण्यास तयार आहोत.

गो फर्स्टने (GoFirst) यापूर्वी 3 मेपासून तीन दिवसांसाठी विमानाची उड्डाणं रद्द केली होती. मात्र ही मुदत वाढवून विमान कंपनीने 9 मेपर्यंत उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्टीचा महिना असल्याने देशांतर्गत विमान प्रवास वाढला आहे. प्रवाशांची देशांतर्गत प्रवासाला पसंती मिळत असतानाच विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणं रद्द केली आहेत.

याआधी गो फर्स्टने (GoFirst) NCLT कडे (National Company Law Tribunal) धाव घेतली होती, पण तिथूनही कंपनीला निराशा मिळाली. एनसीएलटीने (NCLT) गो फर्स्टच्या (GoFirst) याचिकेवर सुनावणी करताना, आयबीसी (ICB) अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे DGCA (Directorate General of Civil Aviation) ने गो फर्स्टला (GoFirst) उड्डाणे रद्द केल्यानंतर प्रवाशांना लवकरात लवकर पैसे परत करण्यास सांगितले आहे.

त्यानंतर गो फर्स्टने (GoFirst) DGCA ला माहिती दिली की, विमान कंपनीने 15 मेपर्यंत तिकिटांची विक्री थांबवली आहे. त्यामुळे, गो फर्स्टची (GoFirst) उड्डाणं 15 मेपर्यंत रद्द असू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

उड्डाणं रद्द करण्याचं 'हे' कारण 

अहवालानुसार, गो फर्स्ट एअरलाईन्सला अनेक दिवसांपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोख रकमेअभावी कंपनी तेल कंपन्यांची थकबाकीही भरण्यास सक्षम नाही, त्यामुळे कंपन्यांनी गो फर्स्टला इंधन देण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत, गो फर्स्टने (GoFirst) सर्व उड्डाणं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा:

Delhi: दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा; नेमकं कशामुळे झाली बाचाबाची?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget