एक्स्प्लोर

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची जंतर-मंतरवर आज 'शेतकरी संसद'

आज 22 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत 'शेतकरी संसद' आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सिंघू सिमेवरुन दररोज 200 शेतकरी आंदोलनासाठी जंतर-मंतरवर एकत्र येणार आहेत.

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या वतीनं आज दिल्लीत जंतर-मंतरवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, 'शेतकरी संसद' आयोजित करण्यात येणार आहे. आज म्हणजेच, 22 जुलैपासून दररोज सिंघू सीमेवरुन 200 आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर दाखल होतील. यापूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एका शेतकरी नेत्यानं म्हटलं की, "शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शांततेत पार पडले, यापैकी एकही शेतकरी संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात व्यत्यय आणणार नाही." अशातच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना अटी-शर्थींसह परवानगी दिली आहे. 

दिल्ली पोलिसांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, शेतकऱ्यांना जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी काही अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीनं 200 हून अधिक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार नाहीत. तसेच सहा व्यक्ती किसान मजूर संघर्ष समितीतील असतील. 

आंदोलक शेतकरी सिंघू बॉर्डरवरुन बसने जंतर-मंतरवर पोहोचतील. त्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करत आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. आंदोलनाबाबत दिल्ली पोलीस म्हणाले की, "शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत."

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी ऑगस्टपर्यंत अधिकाधिक 200 शेतकऱ्यांद्वारे आंदोलन करण्याची विशेष परवानगी दिली आहे. तसेच संयुक्त शेतकरी मोर्चाने सांगितलं की, संसदेचं पावसाळी अधिवेशन जर 13 ऑगस्टला संपलं तर जंतर-मंतरवरील त्यांचं आंदोलनही 13 ऑगस्टपर्यंतच सुरु राहिल. 

तसेच अमेरिकेनं भारतात आपल्या नागरिकांसाठी एक सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यासोबतच गर्दीची ठिकाणांपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pegasus Spyware : संसदेच्या बाहेरही सरकारला घेरणार; पेगॅसस प्रकरणी काँग्रेसचे देशभर पत्रकार परिषदांचे आयोजन

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget