एक्स्प्लोर

IAS Cader rules: सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती; केंद्र आणि राज्य सरकारमध्ये का होतोय नव्या नियमांवरून वाद

IAS Cadre Rules: भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीच्या नियमांवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

IAS Officer Deputation :  केंद्र सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तींबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा सुचवल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांविरोधात भाजपत्तेर राज्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने प्रमुख तरतुदींमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत

केंद्र सरकार घेत असलेला निर्णय हा राज्यांचे अधिकार, त्यांचे महत्त्व कमी करणारा असल्याचे आक्षेप काही राज्यांनी घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांनी विरोध दर्शवला आहे.  हा नेमका वाद काय जाणून घेऊयात...

नियमांमध्ये चार सुधारणा प्रस्तावित

पहिली दुरुस्ती: एखाद्या राज्य सरकारने राज्य केडरच्या अधिकाऱ्याची केंद्राकडे नियुक्ती करण्यास विलंब केल्यास केंद्र सरकारकडून त्या अधिकाऱ्याला संबंधित राज्याच्या केडरमधून मुक्त करण्यात येईल. 

दुसरी दुरुस्ती: केंद्र सरकार राज्य सरकारांशी सल्लामसलत करून केंद्र सरकारकडे नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची वास्तविक संख्या ठरवेल आणि राज्य अशा पात्र अधिकाऱ्यांची नावे पाठवेल.

तिसरी दुरुस्ती: केंद्र आणि राज्य यांच्यात कोणतीही असहमती असल्यास केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल. राज्यांना हा निर्णय एका विशिष्ट कालमर्यादेत लागू करावा लागेल. 

चौथी दुरुस्ती: केंद्राला सार्वजनिक हितासाठी संवर्ग अधिकार्‍यांच्या सेवा आवश्यक असलेल्या विशिष्ट परिस्थितीत, राज्य सरकारे केंद्राच्या निर्णयांना विहित वेळेत लागू करतील.

राज्यांचा आक्षेप काय?

पश्चिम बंगाल, केरळ आणि महाराष्ट्र यांसह प्रामुख्याने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतून विरोधी सूर उमटत असून, राज्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याची भीती व्यक्त होत आहे.  राज्यांच्या 'केडर'मधून अधिकाऱ्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यासाठी केंद्र आणि राज्यांत सामंजस्याची परंपरा आहे. राज्यांच्या मान्यतेने पार पडणाऱ्या या प्रक्रियेच्या नियमात सुधारणा करून, राज्यांच्या मान्यतेचे अधिकार काढून घेण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे.

राज्यातील अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्तीचे अधिकार राज्यांकडे आहेत.  प्रतिनियुक्तीचे अधिकार केंद्राकडे गेल्यास नोकरशाहीवरील राज्याच्या राजकीय नियंत्रणाला धक्का लागू शकतो आणि विरोधी सरकारांच्या विरोधात राजकीय हत्यार म्हणून त्याचा वापर होऊ शकतो, असं राज्यांचं म्हणणं आहे. 

आतापर्यंत राज्यांच्या केडरमध्ये नियुक्ती असलेले आयएएस अधिकारी केंद्राकडे प्रतिनियुक्तीची इच्छा व्यक्त करायचे. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकार्‍यांची यादी बनवायचे आणि त्यानंतर त्यांची प्रतिनियुक्ती होत असे.

केंद्र सरकारची भूमिका काय?

केंद्रात आयएएस अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याने आणि राज्य सरकारे प्रतिनियुक्तीसाठी पुरेशा अधिकाऱ्यांची तरतूद करीत नसल्याने हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे केंद्राने म्हटले. केंद्रात पुरेस अधिकारी नसल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद 

आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरून केंद्र आणि राज्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. मे 2021 मध्ये पश्चिम बंगालमधील आयएएस अधिकारी अलपान बंडोपाध्याय यांच्या प्रतिनियुक्तीवर वाद रंगला होता. त्याआधी, सन 2001 मध्ये केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्येही असाच वाद झाला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार होते. तर, तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या नेतृत्वात राज्य सरकार होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
Embed widget