एक्स्प्लोर

उत्तर प्रदेश मनपा निवडणुकीत भाजपचा विजय, काँग्रेस आणि सपाला दणका

उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर विराजमान होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर विराजमान होणार हे आता स्पष्ट झालं आहे. तर पैकी एका ठिकाणी बसपा, तर एके ठिकाणी समाजवादी समर्थित उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून, महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभागातही भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 68 मधून अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजपच्या माया त्रिपाठींचा पराभव केला. भाजपने कानपूर, झांसी, मेरठ, वाराणसी, लखनऊ, आग्रा, गोरखपूर-मुरादाबाद, अलीगढ आदी महापालिकांमध्ये आपला झेंडा फडकवला आहे. तर बरेलीमध्ये बसपा, आणि गाझीयाबादमध्ये समाजवादी पक्षाने समर्थन दिलेला अपक्ष उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाला आहे. नगरसेवक निवडीमध्येही भाजपनेच बाजी मारली आहे. भाजपचे एकूण 552, काँग्रेसचे 96, समाजवादी पक्षाचे 186, बसपाचे 137, आणि अपक्ष 214 नगरसेवक निवडणून आले आहेत. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन, “जे लोक गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठ-मोठ्या बाता मारत आहेत. त्यांना मनपा निवडणुकीत खातं देखील उघडता आलं नाही,” अशी टीका केली आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयामुळे गुजरातमध्ये काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असल्याचे मत सर्वच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद मोहन यांनी उत्तर प्रदेशमधील मनपा निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना, “अमेठीमधील काँग्रेसचा पराभव अतिशय दुर्दैवी आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या विजयापूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसचं पारडं जड वाटत होतं. पण निवडणूक निकालानंतर काँग्रेसला पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा सामना करताना अडचणींचा सामना करावा लागेल,” असं म्हटलं आहे. एबीपी न्यूजचे कार्यकारी संपादक राजकीशोर यांनी निकालाचं विश्लेषण करताना “मनपा निवडणूक निकालामुळे राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्यात काहीही अडचण येणार नसल्याचं म्हटलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर निवडणूक सेफॉलॉजिस्ट यशवंत देशमुख यांनीही अमेठीमधील काँग्रेसचा पराभव सर्वात मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. कारण, अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण हाच बालेकिल्ला काँग्रेसच्या हातातून जाणं याची अपेक्षा स्वत: पक्ष नेतृत्वानेही केली नसेल असं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra NewsPrayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.