एक्स्प्लोर

नोटाबंदी : नफा, तोटा, सरकार-विरोधकांचे दावे, 10 महत्वाचे मुद्दे

नोटाबंदीचा जो उद्देश होता, तो साध्य झाला नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. तर नोटाबंदीचा उद्देश साध्य झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा म्हणजे नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या घोषणेनंतर या सर्व जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती आरबीआयने दिली. आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली. आरबीआयने जाहीर केलेल्या या आकडेवारीनंतर देशातील राजकारण तापलं आहे. नोटाबंदीचा जो उद्देश होता, तो साध्य झाला नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. तर नोटाबंदीचा उद्देश साध्य झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. नोटाबंदीची आकडेवारी
  • एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही.
  • 500 रुपयांच्या जुन्या नोटेमध्ये 7 हजार 100 कोटी रुपये परत आले नाही आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.
  • एकूण 16 हजार कोटी रुपये परत आले नाही.
  • 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता.
  • 2016-17 दरम्यान बनावट नोटांची संख्या 6 लाख 32 हजार 962 वरुन 7 लाख 62 हजार 72 एवढी झाली आहे. म्हणजे नोटाबंदीनंतर 41 कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या.
सरकारचे दावे काय होते?
  • नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद आणि बनावट नोटा यांना आळा बसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी दिलेल्या भाषणात म्हटलं होतं.
  • नोटाबंदीमुळे 10 ते 11 लाख कोटी रुपये परत येतील. म्हणजे 5 लाख कोटी रुपयांपर्यंतचा काळा पैसा बँकेत परतणार नाही, असा दावा सुप्रीम कोर्टात एका सुनावणीवेळी सरकारकडून करण्यात आला होता.
  • नोटाबंदीमुळे 3 लाख कोटी रुपये (काळा पैसा) बँकेत जमा झाले. तर 1.75 कोटी रुपयांची रक्कम चौकशीच्या घेऱ्यात आहे, असं मोदींनी 15 ऑगस्ट 2017 रोजी लाल किल्ल्यावरुन दिलेल्या भाषणात म्हटलं होतं.
नोटाबंदीमुळे काय नुकसान?
  • नोटाबंदीनंतर पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर 6.1 टक्क्यांवर घसरला, जो 2014 नंतरचा सर्वात कमी आकडा होता. कारण बाजारात चलनाचा तुटवडा होता.
  • रिअल इस्टेट, उद्योग यांसारख्या क्षेत्रांना फटका बसला. हजारो जणांना बेरोजगार होण्याची वेळ आली.
विरोधकांचा आरोप नोटाबंदीची संकल्पना ज्याची होती, त्याला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. नोटाबंदीमुळे 16 हजार आले नाही म्हणजे ते कमावले. पण दुसरीकडे नव्या नोटा छापण्यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च केले. पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी चिदंबरम यांनी केली. सामान्य प्रश्न : त्या मृत्यूंना जबाबदार कोण? नोटाबंदीच्या काळात 104 जणांचा मृत्यू झाला. बनावट नोटाही हद्दपार झाल्या नाही. भ्रष्टाचार आणि दहशतवादही थांबला नाही, मग या सर्वांना जबाबदार कोण? संबंधित बातम्या :

नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा!

नोटाबंदीचा हेतू साध्य, आकडेवारीनंतर जेटलींचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget