एक्स्प्लोर

Bhilwara Model | देशभर चर्चिलं जाणारं, कोरोनाशी प्रभावीपणे लढणारं भिलवाडा मॉडेल नेमकं आहे काय?

कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटाशी नेमकं कसं लढायचं याचं उत्तर अमेरिकेसारख्या महासत्तेसह अनेक राष्ट्रांना मिळालेलं नाही. जगात अनेक ठिकाणी याबाबत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. भारतापुरतं बोलायचं झालं तर सध्या देशात कोरोनाशी लढण्याचाप्रभावी मार्ग दाखवला आहे भिलवाडाने.

नवी दिल्ली : भिलवाडा कुठे आहे असं विचारलं तर अनेकांना पटकन सांगताही येणार नाही. हे काही मुंबई, दिल्ली कोलकात्यासारखं मेट्रो शहर नाही की कुठलं हिल स्टेशन नाही. ना हे अगदी हॉट टुरिस्ट स्पॉट आहे. पण सध्याच्या कोरोना संकटात या भिलवाडाची चर्चा प्रशासकीय पातळीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु आहे. काय आहे हे भिलवाडा मॉडेल? कोरोनाशी लढताना त्यांनी अशा काय उपाययोजना केल्या, ज्यामुळे केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितलं आहे..

कोरोनाच्या या संकटात भल्या भल्या महासत्ताही हतबल आहेत. काय करावं हे त्यांनाही कळत नाही. पण अशावेळी देशपातळीवर तरी त्याचं उत्तर दिलं आहे भिलवाडाने. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनीही या मॉडेलचं कौतुक करुन राज्यांना याच धर्तीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.

विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या देशात राजस्थानात अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका या राज्यालाही होताच. भिलवाडामध्ये 17 मार्चच्या सुमारास एका स्थानिक डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. पण या डॉक्टरची कुठलीही ट्रॅव्हल हिस्टरी नव्हती. त्यामुळे नेमका कुठून संसर्ग झाला आहे या कोड्यात प्रशासन पडलं होतं. भिलवाड्यातले हे प्रतिथयश डॉक्टर. त्यांच्या संपर्कात येणारे रोज हजारो लोक, त्यात इतर डॉक्टर, नर्सेसचाही समावेश. त्यामुळे संसर्गाचा स्त्रोत कळायच्या आत दुसर्‍याच दिवशी भिलवाडामधली संख्या थेट 14 वर पोहोचली. 24 तासांत संख्या एकावरुन 14 वर जाणं याचा अर्थ वैद्यकीय भाषेत भिलवाडा कम्युनिटी स्टेजच्या जवळ पोहोचलं होतं. पहिल्या दुसऱ्या स्टेजऐवजी थेट तिसऱ्याच स्टेजचं आव्हान प्रशासनाच्या अंगावर येऊन पडलं. पण त्यांनी तातडीनं कंबर कसून हे आव्हान पेललं.

नेमकं काय केलं भिलवाडाने?

- राजस्थानात जेव्हा राज्यभर लॉकऊन झालं नव्हतं, त्याच्या काही दिवस आधीच भिलवाडा जिल्हा सर्वप्रथम पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला.

- दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम केलं. जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल 22 लाख लोकांची डोअर टू डोअर तपासणी केली

- ही तपासणी एकदा नाही तर काही दिवसांच्या अंतराने आतापर्यंत तीन वेळा केली आहे.

- एका जिल्ह्यात जवळपास 2000 हजार लोकांची टीम केवळ टेस्टिंगसाठी निर्धारित करण्यात आली

- ज्या 16 हजार लोकांना सर्दी, ताप खोकल्याची लक्षणं सापडली, त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवलं जात होतं.

- पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं चालू तरी होती, एका आठवड्यानंतर तीही बंद करुन सरकारने या सगळ्या वस्तू लोकांना घरपोच करण्याची व्यवस्था केली..

अर्थात या सगळ्याचा परिणाम दिसू लागला. जे भिलवाडा राजस्थानातलं हॉटस्पॉट मानलं जात होतं, तिथे कोरोना निष्प्रभ ठरु लागला. जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट, एसपी हरेंद्र कुमार हे या मॉडेलपाठीमागचे चेहरे. त्यांना राज्याच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली साथ, मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्णय स्वातंत्र्य या गोष्टीही यात मोलाच्या ठरल्या.

काही दिवसांपूर्वी भिलवाडा कोरोनाच्या राष्ट्रीय यादीत झळकत होतं. एकाच वेळी 27 रुग्ण सापडले होते. पण अवघ्या काही दिवसांत इथली परिस्थिती बदलली. 2 एप्रिलपासून इथे कोरोनाचा नवा रुग्णही सापडलेला नाही.

भिलवाडा हे राजस्थानचं टेक्सटाईल सिटी म्हणून ओळखलं जातं. विदेशी पर्यटकांच्या जाण्यायेण्यानं ते कोरोनाच्या गर्तेत सापडलं. देशात सुरुवातीच्या टप्प्यात जे हॉटस्पॉट होते, त्यात मोठा आऊटब्रेक भिलवाड्यात झाला. पण आता भिलवाडा त्यावर मात करतंय. राजस्थानात कोरोनाबाधितांची संख्या आजमितीला 348 इतकी आहे. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पण भिलवाड्याने लावलेला ब्रेक मोठा आहे. कठोर आणि नेमके उपाय करतानाच लोकांना त्रास होऊ नये म्हणून कामात दाखवलेली संवदेनशीलता हा भिलवाडा मॉडेलचा सार आहे. देशातली इतर राज्येही असेच अभिनव उपक्रम राबवून कोरोनाच्या संकटावर मात करतील अशी आशा बाळगूया.

Vaccine on #Corona | कोरोनावरील लस तयार केल्याचा केडिला हेल्थकेअरचा दावा, सध्या प्राण्यांवर चाचणी सुरु

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget