![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus Vaccination Drive: कोरोनाच्या सर्वाधिक लस देणाऱ्या अव्वल देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर, 57.75 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण
गेल्या 24 तासात 3,58,473 लाभार्थ्यांना 8,875 केंद्रांमधून लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1,15,178 एवढी केंद्र झाली आहेत. लसीकरणाच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये रोज सातत्याने वाढ होत आहे.
![Coronavirus Vaccination Drive: कोरोनाच्या सर्वाधिक लस देणाऱ्या अव्वल देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर, 57.75 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण Coronavirus Vaccination Drive: India ranks third among the top recipients of Covid-19 vaccine Coronavirus Vaccination Drive: कोरोनाच्या सर्वाधिक लस देणाऱ्या अव्वल देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर, 57.75 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/25122235/Corona-Vaccination.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचं काम वेगाने सुरु आहे. कोरोना लसीकरणामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे. भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. देशभरात 7 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 57,75,322 लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. यामध्ये 53,04,546 आरोग्य कर्मचारी आणि 4,70,776 फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात 3,58,473 लाभार्थ्यांना 8,875 केंद्रांमधून लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1,15,178 एवढी केंद्र झाली आहेत. लसीकरणाच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये रोज सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात भारतामध्ये दैनंदिन मृत्यूंची संख्या 80 पेक्षा कमी नोंदविली गेली आहे, जी गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे. देशातील अॅक्टिव रुग्णसंख्या 1.48 लाख इतकी आहे. तर आतापर्यंत 1.05 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.19 टक्के आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 1,739 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्रात 2,768 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासाच 78 मृत्यूंची नोंद आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 25 मृत्यू नोंदवले गेले आहेत.
दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहे, असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. राज्याचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)