एक्स्प्लोर

Coronavirus: भारत परकीय मदत स्वीकारणार, कोरोनामुळे 16 वर्षानंतर धोरणात मोठा बदल

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तरी परकीय मदत (foreign aid) स्वीकारायची नाही या 16 वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या धोरणात आता बदल करण्यात आला आहे. नव्या बदलानुसार आता भारत परकीय मदत, दान किंवा भेटी स्वीकारू शकतो (India open to foreign aid).

नवी दिल्ली : देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सगळीकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा, बेड्सची अपुरी संख्या लसींचा अपुरा पुरवठा अशी स्थिती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताने आपल्या परकीय मदत स्वीकरण्यासंबंधी 16 वर्षापूर्वीच्या एका धोरणात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, भारत आता इतर देशांकडून परकीय मदत, दान किंवा गिफ्ट स्वीकारू शकतो. कोरोनामुळे भारताच्या या धोरणात महत्वपूर्ण बदल झाला आहे. 

या बदललेल्या धोरणाचा आणखी एक फायदा म्हणजे भारत आता चीनकडूनही ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी साहित्य किंवा जीव वाचवणारी औषधं खरेदी करू शकतो. या व्यतिरिक्त राज्य सरकारही जीव वाचवण्यासाठीची आवश्यक औषधं आणि साहित्य जगातल्या इतर देशांकडून स्वतंत्र्यपणे खरेदी करू शकतात. केंद्र सरकार त्यांना कोणतीही आडकाठी आणणार नाही. पण अशी मदत जर पाकिस्तानकडून करण्यात आली तर काय करायचे याबाबत भारताचं कोणतंही धोरण ठरलेलं नाही. 

आत्मनिर्भरता आणण्यासाठी घेतला होता निर्णय 
भारताच्या धोरणात झालेला बदल हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 16 वर्षापूर्वी, परकीय मदत न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्या आधी भारताने उत्तर काशी भूकंप (1991), लातूर भूकंप (2003), गुजरात भूकंप (2001), बंगालचे वादळ (2002) आणि बिहार पूर (2004) या संकटाच्या दरम्यान परकीय मदत स्वीकारली होती. 

डिसेंबर 2004 साली भारतात आलेल्या त्सुनामीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी भारत कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो त्यामुळे यापासून पुढे कोणत्याही आपत्तीच्या वेळी परकीय मदत स्वीकारणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर भारताने 2013 मध्ये केदारनाथ पूर, 2005 सालचा काश्मिर भूकंप आणि 2014 सालच्या काश्मिर पूर स्थितीमध्ये परकीय मदत स्वीकारण्याचं नाकारलं होतं. 

केरळमध्ये 2018 साली आलेल्या पूर परिस्थितीवेळी संयुक्त अरब अमिरातीने 700 कोटी रुपयांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी केंद्र सरकारने तशी कोणतीही मदत स्वीकारण्याचे नाकारले होते. 

कोरोना संकटात 20 देशांनी केली मदत
सध्या भारत कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे आपल्या 16 वर्षाच्या जुन्या धोरणात बदल करावा लागला आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स या देशांसोबत जगातल्या 20 देशांनी भारताला वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे. तसेच चीनसोबतच्या धोरणातही बदल झाला असून भारताने चीनला 25 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची ऑर्डर दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Embed widget