एक्स्प्लोर

दुबईहून 182 भारतीय कोची विमानतळावर दाखल, तर मालदीवमध्ये अडकलेले 750 जण भारताच्या दिशेने रवाना

दुबईहून 182 भारतीय कोची विमानतळावर दाखल झालं तर मालदीवमध्ये अडकलेले 750 भारतीय कामगार जलाश्म युद्धनौकेतून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकटात परदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परतले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने 182 भारतीय कोची विमानतळावर पोहोचली आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबई विमानतळावरून पहिलं विमान काल (गुरुवारी) संध्याकाळी रवाना झालं असून रात्री उशीरा कोची विमानतळावर दाखल झालं आहे. 182 लोकांमध्ये 5 लहान मुलांचाही समावेश आहे. परदेशातून परतलेल्या भारतीयांसाठी विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विमानतळावर सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. येणाऱ्या लोकांचं थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, पाच लहान बाळं आणि 177 प्रौढ प्रवाशांना घेऊन एक विमान रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी कोची आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की, एवढ्याच प्रवाशांसह आणखी एक विमान 10 वाजून 32 मिनिटांनी दुबईहून कोझिकोड येथे पोहोचलं आहे.

जवळपास एक आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या या अभियानामध्ये सध्या 64 उड्डानं आणि काही नौदलाच्या युद्धनौकांमार्फत परदेशातील भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहेत. एका आठवड्यात 64 उड्डानांमार्फत देशातील 14.5 हजारांहून अधिक भारतीय घरी परतणार आहेत. सर्वात जास्त 15 फ्लाइट्स केरळमध्ये जाणार आहेत. तर दिल्ली-एनसीआर आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी 11, तेलंगाणा 7 आणि गुजरातमध्ये 5 फ्लाइट्स पाठवण्यात येणार आहेत.

गृह मंत्रालयाने सांगितले की, परदेशात विमानाच्या उड्डानाआधी प्रवाशांचं मेडिकल स्क्रिनिंग केलं जाणार आहे. ज्या भारतीयांमध्ये खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणं असतील. त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच भारतात आल्यानंतर या लोकांना 14 दिवसांसाठी रूग्णालयात किंवा इतर ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

मालदीव मार्गे परतणार भारतीय

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरु करण्यात आलं आहे. अशातच मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. त्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतूच्या नावाने दोन नौदलातील युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात INS जलाश्वतून जवळपास 750 भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येणार आहे. जवळपास 900 किमीचा प्रवास करून हे जहाज कोची बंदरात दाखल होणार आहे. येथे या नागरिकांना उतरवल्यानंतर त्यांच्या राज्यांतील जिल्ह्यांत पोहोचवण्यात येणार आहे.

या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 40 डॉलर म्हणजेच, जवळपास 3 हजार 26 रुपयांचं सेवा शुल्क आकारण्यात आलं आहे. 40 डॉलर प्रवास शुल्क न म्हणता, सेवा शुल्क म्हणण्याचं कारण म्हणजे, इतर वेळी मालदीव वरून कोचीला येण्याऱ्या लग्जरी क्रूज शिप्स सरासरी 32 हजार रुपयांचं प्रवास शुल्क आकारण्यात येतं.

महत्त्वाच्या बातम्या

आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget