एक्स्प्लोर

BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी

Devendra Fadnavis on Thackeray Brothers: राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला खूप उशीर केला, मुंबईत भाजपच निवडून येईल; देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारपासून मुंबईत प्रचारसभा घ्यायला सुरुवात करणार आहेत. ठाकरे बंधू आता मैदानात उतरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटाविरोधात तोफ डागणार आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे यश मिळेल, अशी अटकळ त्यांच्या समर्थकांकडून बांधली जात आहे. मात्र, मुंबईत काही झालं तरी ठाकरे बंधूंनी यश मिळणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आहे. त्यासाठी त्यांनी भाजपची मुंबईबाबतची एक थिअरी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत मांडली.

ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झाला आहे. असं आहे की, या दोघांची मतं संपल्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. 2009 साली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर वेगळा रिझल्ट लागला असता. आता दोघेही एकत्रित येऊन फायदा नाही. दोघांच्याही मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, आता यांना मराठी माणूसही मतं देणार नाही आणि अमराठी नागरिकही मतदान करणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, ठाकरे बंधू एकत्र आल्याची आ्हाला काहीच चिंता नाही. मुंबईत भाजप निश्चितपणे निवडून येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मराठी माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घराचा आहे. दक्षिण मुंबईत घरांच्या किंमती परवडत नाही म्हणून मराठी माणूस तिथून हद्दपार झाला. आज दक्षिण मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला आम्ही घरं देतोय. ठाकरे फक्त बोलत राहिले, मोर्चे काढले, मोर्च्यांनी पोट भरतं का? शिवसेनेची सत्ता असताना ठाकरेंनी  मराठी माणसांच्या घरांसाठी एकतरी प्रकल्प केला का? आज आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकास करुन 80 हजार मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार होण्यापासून वाचवले. मी हा प्रकल्प खासगी बिल्डरच्या हातात जाऊन दिला नाही. त्यांचा इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. मी बीडीडी चाळीचा प्रकल्प म्हाडाच उभारेल, असा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही, पश्चिम बंगालचा दाखला देत राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार प्रहार; म्हणाले, भाजप सत्तेतून जाईल तेव्हा...

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget