एक्स्प्लोर

कृषी विधेयकावरून काँग्रेसच्या देशव्यापी पत्रकार परिषदा; पक्षातील मोठ्या नेत्यांचा सहभाग

कृषी विधेयकावरून काँग्रेस पक्ष आज सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे. कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसने पन्नास दिवसांच्या देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली आहे.

नवी दिल्ली : कृषी विधेयकावरून काँग्रेस आज देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. आज सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या मोठे नेत्यांच्या पत्रकार परिषदा होणार आहेत. सोनिया गांधी यांची सल्लागार समितीसोबतच पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी काँग्रेसने पन्नास दिवसांसाठी देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली. ज्यातंर्गत आज प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या शहरात पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.

काँग्रेस नेता राजभवनापर्यंत पदयात्रा काढणार

आज सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा पार पडल्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक राज्यांमध्ये काँग्रेस नेते राजभवनापर्यंत पदयात्रा काढत राष्ट्रपतींच्या नावे राज्यपालांना निवेदन देणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की, 2 ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात धरणं आंदोलन करण्यात येईल आणि 10 ऑक्टोबर रोजी प्रत्येक राज्यात शेतकरी परिषद भरवण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते 31 ऑक्टोबरपर्यंत गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवतील. या मोहीमेदरम्यान पक्षाने 2 कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. या मोहीमेत घेण्यात आलेल्या सर्व स्वाक्षऱ्या 14 नोव्हेंबरला राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्याचं धोरण पक्षाने आखलं आहे.

पंजाब आणि हरियाणात शेतकरी विधायकाविरोधात आंदोलनं

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलनं करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉपर्पोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्ठात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.

विधेयकाच्या विरोधात राष्ट्रपतींना लिहिणार चिठ्ठी

बुधवारी गुलाम नबी आझादने 14 दलांच्या वतीने राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर म्हणाले की, सरकारने सर्वांसोबत चर्चा करायला पाहिजे होती. परंतु, दुर्दैवाने सरकारने विधेयक ना सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं ना स्टँडिंग कमिटीकडे. अन्यथा हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असतं.

त्यांचं म्हणणं आहे की, 'राज्यसभेमध्ये ज्याप्रकरे बिल पारित करण्यात आलं. त्याविरोधात आम्ही राष्ट्रपतींना चिठ्ठी लिहिली होती. संख्याबळ आमच्या बाजूने होतं. सध्या जो विरोध सुरु आहे, त्यासाठी सरकार जबाबदार आहे. मागण्या करण्यात येत असतानाही, मतविभाजन झालं नाही. लोकशाहीच्या मंदिरात राज्यघटनेची पायमल्ली झाली. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं आहे. ही विधेयकं मंजूर करण्याची पद्धत असंवैधानिक आहे.'

गुलाब नबी आझाद यांचं म्हणणं आहे की, आम्ही निवेदन केलं आहे की, राष्ट्रपतींनी ही विधेयकं परत पाठवावीत. जेणेकरून याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येतील आणि आवश्यक सुधारणाही करण्यात येतील. तसेच राष्ट्रपती यासंदर्भात बोलताना म्हणाले की, ते याबाबत लक्ष देऊन विचार करतील.

विविध राज्यांमध्ये काँग्रेसच्या पत्रकार परिषदांचे शेड्यूल :

1. पाटणा : रणदीप सुरजेवाला, शक्ति सिंह गोहिल

2. लखनऊ: कॅप्टन अमरिंदर सिंह, अमर सिंह, कुलजीत नागरा

3. नागपूर : भूपेश बघेल

4. मुंबई : एच. के. पाटिल

5. भुवनेश्वर : दिग्विजय सिंह

6. जयपूर : अजय माकन, टी. एस. सिंह देव

7. चंदीगड (पंजाब) : हरीश रावत

8. चंदीगड (हरियाणा) : पवन बंसल

9. शिमला : राजीव शुक्ला

10. बंगाल : मोहन प्रकाश

11. बंगळुरू : केसी वेणुगोपाल

12. हैदराबाद : मल्लिकार्जुन खडगे

13. चेन्नई : दिनेश गुंदुराव

14. तिरुअनंतपुरम : तारिक अनवर

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget