एक्स्प्लोर

सरन्यायाधीश राज्य अतिथी म्हणून घोषित; कायदा दाखवताच निघालं परिपत्रक, दौऱ्यासंदर्भात दिशानिर्देश जारी

सरन्यायाधीश यांच्याकडून नाराजी जाहीर केल्यानंतर राज्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दादर चैत्यभूमीवर जाऊन सरन्यायाधीशांचे स्वागत केले.

मुंबई : देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे भूमीपुत्र भूषण गवई (Bhushan gavai) यांनी शपथ घेतली. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. मुंबई व गोवा बार असोसिएशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताही प्रोटोकॉलनुसार राज्याचे सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्यापैकी कोणीही त्यांच्या स्वागताला उपस्थित नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, मी प्रोटोकॉलसाठी हे बोलत नसून राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख असल्याने त्या पदाचा सन्मान राखला पाहिजे, असे म्हणत सरन्यायाधीशांनी आर्टिक 142 चा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर, आता राज्य सरकारने या घटनेची दखल घेत सरन्यायाधीश यांना कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे, यापुढे सरन्यायाधीशांच्या (CJI) दौऱ्यात काय करावे, काय प्रोटोकॉल पाळावे याचे परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे. 

सरन्यायाधीश यांच्याकडून नाराजी जाहीर केल्यानंतर राज्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दादर चैत्यभूमीवर जाऊन सरन्यायाधीशांचे स्वागत केले. मात्र, या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहून सरन्यायाधींशाच्या अवमानाबद्दल मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. त्यानंतर, आता राज्य सरकारने देशाच्या सरन्यायाधीश यांना कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित केले. त्यामुळे, यापुढे सरन्यायाधीशांच्या दौऱ्यासाठी विशेष प्रोटोकॉल लागू असणार आहेत. त्यानुसार, सरन्यायाधीशांच्या महाराष्ट्र प्रवासात कोणते राजशिष्टाचार पाळावेत, यासाठी राज्य सरकारकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले असून परिपत्रक संबंधितांना पाठवण्यात आले आहे. 

राज्य सरकारने काय दिले दिशानिर्देश

भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित
मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, पोलिस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी हे मुंबईत सरन्यायाधीशांचे स्वागत करतील
राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.
कोणी व्हीव्हीआयपी येत असतील तर त्यांच्या विभागाशी संबंधित संपर्कासाठी समन्वय अधिकारी नेमणे आधीच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधी व न्याय विभागाने मुंबईसाठी, तर जिल्ह्यात असेल तिथे जिल्हाधिकार्‍यांनी समन्वयासाठी क्लास 1 अधिकारी नेमणे बंधनकारक असेल.

सरन्यायाधीशांनी नोटीस पाठवावी

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत व गरिमा राखली पाहिजे. जेव्हा ते खुर्चीवर बसतात, तेव्हा ज्यांनी त्यांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केलं, अशा सेक्रेटरींना त्यांनी नोटीस बजावली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशाचे चीफ जस्टीस भूषण गवई यांच्याबाबत नाराजीच्या चर्चेवर भाष्य केलं.

हेही वाचा

चांदीच्या गौरी, 7.5 किलोची चांदीची ताटं अन् अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी; सासूच्या पायावर मी डोकं ठेवलं, नणंदेच्या पाया पडलो, वैष्णवीच्या वडिलांना हुंदका आवरेना, हादरवणारी कहाणी सांगितली!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget