एक्स्प्लोर

coronavirus | मुलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मुलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं : हायकोर्ट

राज्यभरातील वैद्यकीय सेवा पुरवणारे अधिकारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विस्थापितांच्या समस्यांसदर्भात हायकोर्टात दाखल एका सुमोटो याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वरळे यांच्यासमोर सुनावणी झाली.

मुंबई : आपल्या मुलभूत अधिकारांबाबत जागरूक राहणाऱ्या नागरिकांनी सध्याच्या काळात आपल्या मुलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक राहण्याची गरज असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन वारंवार करत असलेल्या सूचना लोकं गंभीरतेना घेताना दिसत नाहीत. लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही या साध्या सूचना लोकं पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे काही नागरिकांमुळे समाजाची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे, असं निरीक्षण नुकतच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नोंदवलं आहे.

राज्यभरातील वैद्यकीय सेवा पुरवणारे अधिकारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विस्थापितांच्या समस्यांसदर्भात हायकोर्टात दाखल एका सुमोटो याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वरळे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात राज्यातील लोकांना फळ, भाज्या यांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनानं शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरम्यान येणारे अडथळे दूर करावेत. मध्य प्रदेशातील कामगार सध्या मोठ्या प्रमाणात औरंगाबादमध्ये अडकून पडल्यानं प्रशासनानं त्यांची जिल्हा परिषदेच्या शाळेत सोय करावी. तसेच एका त्रिसदस्यीय समितीतर्फे जिल्हा, पालिका आणि राज्य सरकराच्या पातळीवर यावर देखरेख ठेवावी. याकामात बड्या बड्या कंपन्यांच्या सीएसआर फंड तसेच सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी असेही निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी कोर्टाला माहिती दिली की, राज्य सरकारनं वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 3 हजार पीपीटी किट्स आणि 50 हजार हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन गोळ्यांची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या सुनावणीत हायकोर्टानं समाजमाध्यमांत फिरत असलेल्या चुकीच्या संदेशांबाबतही नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये मेसेज फिरत होता की, स्थानिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याऐवजी काही खाजगी क्लीनिकमध्ये केवळ परदेशी नागरीकांनाच सेवा पुरवली जात आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांनी या मेसेजमध्ये जराही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे लोकांनी कोणतीही खातरजमा न करता आलेले मेसेज पुढे पाठवण टाळायला हवं, असं स्पष्ट करत हायकोर्टानं यासंदर्भातील सुनावणी 15 एप्रिलपर्यंत तहकूब केली.

संबंधित बातम्या : 

Lockdown | सोलापुरमध्ये बँकेसमोर दीड किलोमीटरची रांग | ग्राऊंड रिपोर्ट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Pratibha Pawar Sonia Gandhi : प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर, कॅप्शनमध्ये विशेष उल्लेख
प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर, कॅप्शनमध्ये विशेष उल्लेख
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget