BSF jawan captured by Pakistan : तब्बल 80 तास अन् अधिकाऱ्यांचा तीन बैठका होऊनही 'तो' बीएसएफ जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! माहिती सुद्धा देईनात, आतापर्यंत काय काय घडलं?
BSF jawan captured by Pakistan : अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे.

BSF jawan captured by Pakistan : पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली. अटक होऊन 80 तासांहून अधिक काळ लोटला आहे, पण बीएसएफ जवानाची सुटका झालेली नाही. 23 एप्रिल रोजी दुपारी बीएसएफच्या 182 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले, त्यामुळे ते चुकून पाकिस्तानी सीमेत घुसले, असे सांगण्यात आले. यादरम्यान, पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना पकडले.
पाकिस्तानकडून कोणतीही माहिती देण्यास नकार
पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, बीएसएफ जवानाबद्दल कोणतीही माहिती नाही. बीएसएफने जवानाच्या परतीसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले होते. आतापर्यंत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तीन ध्वज बैठका झाल्या आहेत. पण त्या सैनिकाची अद्याप सुटका झालेली नाही. अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर, बीएसएफने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सर्व युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले आहे. बीएसएफने पाकिस्तानी सैन्यासोबत पुन्हा एकदा फील्ड कमांडर स्तरावरील ध्वज बैठकीची मागणी केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की ही बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे. बीएसएफच्या महासंचालकांनी केंद्रीय गृहसचिवांना संपूर्ण घटनेची आणि सैनिकाच्या सुरक्षित परतीसाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली आहे.
बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी
बीएसएफ जवानाच्या अटकेमुळे त्याचे कुटुंब खूप चिंतेत आहे. बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. अटक झाल्यापासून, सैनिकाचे संपूर्ण कुटुंब खूप चिंतेत आहे आणि त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला लवकर परत आणण्यासाठी सरकारकडे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव असताना ही घटना घडली आहे. भारताने पाकिस्तानवर सीमेपलीकडून दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे आणि कडक पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितले की, सैनिकाच्या परतीसाठी पाकिस्तान रेंजर्सवर दबाव आणला जात आहे. ध्वज बैठकींच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























