एक्स्प्लोर

Osmanabad Water Storage Update : उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठा शिल्लक; 34 प्रकल्प कोरडेठाक

Osmanabad Water Storage Update : जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी 7.32  इतकी आहे.

Osmanabad Water Storage Update : यंदा मान्सून उशिरा आला, त्यात जुन महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे वातावरण तयार झाले. मराठवाड्यात देखील याच काळात पावसाने हजेरी लावली. मात्र, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हा सोडला तर इतर जिल्ह्यात अजूनही मोठा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प कोरडे पडतांना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांची 726.962  दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी 7.32 इतकी आहे. जिल्ह्यातील 34 प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाळा सुरु होऊन दुसरा महिना संपत आला असतांना शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पाऊस पडतांना दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील तब्बल 34 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांनाचा विचार केल्यास फक्त 7.32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती...

  • जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 17, लघु 208, असे एकूण 226 प्रकल्प आहेत. 
  • जिल्ह्यातील या 226 प्रकल्पांची साठवण क्षमता 726.962  आहे. 
  • या प्रकल्पातून अनेक शहरे व गावांना पाणीपुरवठा होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले तर वर्षभर पाणीपुरवठा होत असतो. 
  • 27 जुलैपर्यंत एकूण 226 प्रकल्पात 53.2468 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 
  • त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही 7.32 इतकीच आहे. 
  • जिल्ह्यातील 34 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. 
  • तसेच जिल्ह्यातील 110 प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
  • तर 67 प्रकल्पात 25 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. 
  • 12 प्रकल्पात 26 ते 50 टक्के पाणीसाठा आहे. 
  • केवळ तीन प्रकल्पातच 51 ते 75 टक्क्यापर्यंत पाणीसाठा आहे.

मागील वर्षे जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागील वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस प्रकल्पात 233.4804 दलघमी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी 32.12 टक्के इतकी होती. मात्र यावर्षी जोरदार पाऊस न झाल्याने 7.32 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Terna Dam Water Storage : उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'तेरणा'त केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
Dharashiv News: नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget