एक्स्प्लोर

'नादाला लागू नका, मी मरायला भीत नाही, मला मारल्यावर हा आग्या मोहोळ तुमचं काय करेल?; जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange : मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केला जाते, पण मी मरायला भीत नाही. तसेच, मला मारल्यावर हा आग्या मोहोळ तुमचं काय करेल, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आजपासून पुन्हा राज्याचा दौरा करत आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी जरांगे यांची धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील वाशी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलतांना जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. "मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण देण्यात यावे, आमच्या नादाला लागू नका. मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केला जातो, पण मी मरायला भीत नाही. तसेच, मला मारल्यावर हा आग्या मोहोळ तुमचं काय करेल, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

वाशी येथील सभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मी कुठे अडचणीत सापडतो का? याची खात्री सरकारने केली. पण माझ्याकडे आहे तरी काय, सिमेंटचे पत्रे ज्याला कोणी भंगारमध्ये सुद्धा घेत नाही. बँडमध्ये खुळखुळा वाजवणारा सारखा मी दिसतो. तुम्ही माझं काय करणार, मी मरायला देखील भीत नाही. मला मारल्यावर हे आग्या मोहोळ तुमचं काय करेल. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. आमची एकच विनंती आहे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे," असे जरांगे म्हणाले. 

बॅनर काय तुझ्या बापाचा होता

आमच्या भोकरदनच्या नेत्याने आम्ही लावलेला गाव बंदीचा बॅनर फाडला. मला गावात यायचं आहे, त्यामुळे बॅनर काढा असे हा नेता म्हाणाला होता. पण, बॅनर काय तुझ्या बापाचा होता. मराठ्यांच्या पोरांनी लावलेलं बॅनर काढलं आणि त्यांना मारहाण देखील केली. त्या नेत्याची मजा येणार आहे, थोडं दिवस थांब म्हणावं, एकदा आम्हाला आरक्षण मिळू द्या. आरक्षणामुळे आम्ही देखील शांत आहोत. एकदा आम्हाला आरक्षण मिळू दे, तुझी गाठ आमच्यासोबतच आहे असे जरांगे म्हणाले. 

'जो आमचा, आम्ही त्याचे'

आणखी काही दिवस झुंजाची वेळ आली तरीही चालेल, असं घराघरातील मराठ्यांनी ठरवलं आहे. सामान्य मराठा देखील या आंदोलनात उतरला आहे. मराठा समाजाने जे नाही त्या लोकांना मोठं केलं आहे. नेत्यांचे स्टीकर चिटकवले, त्यांचे बॅनर बांधले. लेकरांना भविष्यात मदत करतील म्हणून आपल्या बाप जाद्यांनी या नेत्यांना मोठं केलं. 70 वर्षात सर्वच पक्षातील नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं. कधीकाळी आपल्या लेकरांना मदतीला येईल म्हणून मराठ्यांनी यांना ताकदीने मोठं केलं. पण ज्यांना तुम्ही मोठं केलं तेच नेते आज मराठा आरक्षणाच्या विरोधात उतरले आहे. रात्र दिवस मेहनत करून यांच्यावर मराठ्यांनी गुलाल टाकला. पण, आज आमचे लेकरं मोठं करण्याची वेळ आल्यावर हे  विरोध करायला लागले. त्यामुळे आज खरा मराठा जागा झाला आहे. जो आमचा, आम्ही त्याचे असं मराठ्यांनी ठरवलं आहे. अन्यथा आमच्या गावात उभं राहायचं नाही, असेही जरांगे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : निष्पाप मुलांना फसवू नका, उद्यापासून 'ती' कारवाई बंद करा; जरांगे थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकले

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, राणाजगजितसिंह पाटलांना कार्यक्रमातून डावलले; ओमराजे निंबाळकरांची प्रमुख उपस्थिती, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, राणाजगजितसिंह पाटलांना कार्यक्रमातून डावलले; ओमराजे निंबाळकरांची प्रमुख उपस्थिती, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget