एक्स्प्लोर

Manoj Jarange : निष्पाप मुलांना फसवू नका, उद्यापासून 'ती' कारवाई बंद करा; जरांगे थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकले

Manoj Jarange : आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निष्पाप मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे विनंती केली आहे.

बीड : जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीनंतर पोलिसांनी अनेकांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या आणि निष्पाप मुलांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान, आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निष्पाप मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे विनंती केली आहे. तसेच उद्यापासून निष्पाप लोकांना अडकवण्याची कारवाई बंद करण्यात यावी असेही जरांगे म्हणाले आहेत. 

दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्या भेटीनंतर जरांगे म्हणाले की, "बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीत सहभागी नसलेल्या आणि ज्यांचा कोणताही या घटनेशी संबध नसतांना त्यांना अटक केली जात आहे. तसेच सरसकट त्यांच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 307 नुसार गुन्हे दाखल केले जात आहे. काही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर देखील पुन्हा त्यांना पोलीस कोठडीत टाकले जात आहे. त्यामुळे आज बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा त्यांच्याकडे विनंती केली आहे. ज्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे त्यांच्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र, ज्यांचा सहभाग नाही अशा तरुणांना विनाकारण त्रास का दिला जात आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

उद्यापासून त्रास देणं बंद करा...

बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन तीन याद्या तयार केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हे तर सर्व बीड जिल्ह्यातील लोकांना गुंतवल्या सारखं होईल. तर, ज्यांच्या या घटनेशी काहीही संबध नाही अशा गोरगरीब मुलांवर अन्याय होऊ नयेत अशी आम्ही पोलिसांकडे विनंती केली आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील सर्वच सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते. ज्यांचा या प्रकरणात सहभाग आहे त्यांच्याबद्दल आमचं काहीच मत नाही. पण ज्यांचा सहभागच नाही त्यांना उद्यापासून कोणताही त्रास होऊ नयेत अशी आमची मागणी असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

. काही अधिकारी विनाकारण मुलांना त्रास देतायत...

बीडमधील जाळपोळ प्रकरणात ज्यांचा कोणताही संबध नाही अशा लोकांना पोलीस आतमध्ये कसे ठेवू शकतात, किंवा त्यांचे नावं अज्ञातमध्ये घेऊन त्यांची चौकशी करू शकतात. काही अधिकारी विनाकारण मुलांना त्रास देत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांची वेदना आहे, म्हणजेच त्यांनी काही पाप केले नाही. ज्यांनी राडा केला त्यांच्याबद्दल मराठा समाजाचे कोणतेही मत नाही. पण जे नाहीत त्यांच्याबद्दल आमचे मत असणारच आहे. संबध नसतांना त्यांच्यावर तुम्ही अन्याय कसे करू शकतात. त्यामुळे असा अन्याय होणार नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले असल्याचे जरांगे म्हणाले. 

सर्वांवर 307 नुसार सरसकट कसे गुन्हे दाखल करतात?

ओबीसी नेत्यांच्या दबावाशिवाय असे खोटे गुन्हे दाखल केले जाणारच नाही. पोलिसांनी विनाकारण एवढ्या मोठ्या प्रमाणात नावं घेतलेच नाही, पण आता त्यांना हे नावं देण्यात आले आहे. पण आपल्यावर दबाव असल्याचे आता पोलीस काही सांगणार नाही. पण यात आमचे लेकरं विनाकारण अडकत आहे. आंदोलनात फक्त उभा राहिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वांवर 307 नुसार सरसकट कसे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार; पहिल्याच दिवशी मनोज जरांगेंचा एल्गार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: अवघ्या 12 दिवसांपूर्वी थाटला संसार; बीडमध्ये नवविवाहित तरुण तलाठ्यानं गळ्याला दोर लावला, पत्नी ड्युटीवर जाताच...
अवघ्या 12 दिवसांपूर्वी थाटला संसार; बीडमध्ये नवविवाहित तरुण तलाठ्यानं गळ्याला दोर लावला, पत्नी ड्युटीवर जाताच...
बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या 
बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या 
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Embed widget