एक्स्प्लोर

Marathwada Rain : मराठवाड्यात पाच दिवसांत 50 मिमी पाऊस, अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा

Marathwada Rain Update : सरासरीच्या तुलनेत 454 मि.मी. पाऊस झाला असून,अजूनही 225 मि.मी. पावसाची तूट कायम आहे.

Marathwada Rain Update : ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात (Marathwada) मागील पाच दिवसांत 50 मिमी पाऊस झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असलं तरीही अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा कायम आहे. कारण अजूनही अनेक प्रकल्प कोरडेठाक असून, विहिरी देखील आटल्या आहेत. 

मराठवाड्यात मागील पाच दिवसांत 50 मि.मी. पाऊस झाला असून, विभागाची वार्षिक सरासरी 679 मि.मी. आहे. सरासरीच्या तुलनेत 454 मि.मी. पाऊस झाला आहे. तर अजूनही 225 मि.मी. पावसाची तूट कायम आहे. पावसाची टक्केवारी पाहिली तर 66.8 पाऊस झाला असून, 34 टक्क्यांची तूट आहे. मागील वर्षी 117 टक्के पाऊस झाला होता. 10 सप्टेंबरपर्यंत 670 मि.मी. पाऊस झाला होता. मराठवाड्यात कमी पावसामुळे 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याचे चित्र आहे. त्यात 6 सप्टेंबरच्या रात्रीपासून विभागात पाऊस सुरू झाला असून, चार जिल्ह्यांतील 10 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस 

अ.क्र.  जिल्ह्याचे नाव  झालेला पाउस 
1 औरंगबाद  362 मि.मी 
2 जालना  369 मि.मी
3 बीड  307 मि.मी
4 लातूर  406 मि.मी
5 उस्मानाबाद  335 मि.मी
6 नांदेड  775 मि.मी
7 परभणी  386 मि.मी
8 हिंगोली  582 मि.मी
  एकूण  454 मि.मी


पिकांना जीवनदान... 

यंदा मान्सून उशिरा आल्याने पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. त्यात जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यावर ऑगस्ट महिना मात्र कोरडा गेला. त्यामुळे पिकांनी अक्षरशः माना टाकल्या होत्या. तर काही ठिकाणी पिकं करपू लागली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. अशात मागील चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. खरीपाचे पिकं शेवटच्या टप्प्यात असताना हा पाऊस झाला असल्याने, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पण, अजूनही विहिरी आणि धरणं भरली नाही. त्यामुळे आगामी काळात आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. त्यातच आता पावसाचे फक्त 20 दिवस उरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नजरा अजूनही पावसाकडेच लागल्या आहेत. 

शेतकरी आत्महत्या वाढल्या...

पावसाने पाठ फिरवल्याने यंदाचे खरीप हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आता कोरड्या दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठ महिन्यात विभागात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rain News : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती, पावसासाठी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: वॉरंट घेऊन आले अन्... परराज्यातील पोलिसांवर दगडांचा मारा; गांजा तस्कराला पळवलं, छ. संभाजीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या
वॉरंट घेऊन आले अन्... परराज्यातील पोलिसांवर दगडांचा मारा; गांजा तस्कराला पळवलं, छ. संभाजीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
छत्रपती संभाजीनगर हादरलं! गळाभेट घेण्याचा बहाणा करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर हादरलं! गळाभेट घेण्याचा बहाणा करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Embed widget