एक्स्प्लोर

Marathwada News: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान; 8 जणांचा मृत्यू,150 जनावरे दगावली, मालमत्तांचे नुकसान, 67 गावाचा संपर्क अद्याप तुटलेला, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत

Marathwada News: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. आठवडाभरापासून सुरू असल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे. सोबतच जीवितहानीही झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने (Marathwada Heavy Rain News) अक्षरशः हाहाकार माजवला. मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून पावसाने अनेकांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने (Marathwada Heavy Rain News) कहर केला. पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे. पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच, शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत दीडपट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात आलेले खरीप हंगामातील पीक आडवे झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. आठवडाभरापासून सुरू असल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे. सोबतच जीवितहानीही झाली आहे. (Marathwada Heavy Rain News) 

Marathwada Heavy Rain: जीवितहानी आणि वित्तहानी

मराठवाड्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्ह्यातील लातूर 3, धाराशिव 1, बीडमधील दोन तर नांदेडमध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात एकूण लहान-मोठी 150 जनावरे दगावली. त्यात संभाजीनगर जिल्ह्यात 5, जालना 15, परभणी जिल्हात 6, हिंगोलीमध्ये 6, नांदेड जिल्ह्यात 9, बीड जिल्ह्यात 63, लातूर जिल्ह्यामध्ये 7, धाराशिव जिल्ह्यातील 21 जनावरांचा समावेश आहे.

Marathwada Heavy Rain:  मराठवाड्यात एकूण खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे 76 ठिकाणी नुकसान 

6 ठिकाणी रस्ते वाहून गेले.
5 ठिकाणी फुल वाहून गेले.
327 पक्की घरे पडली झाली
दोन शाळाची पडझड झाली.
4 ठिकाणी तलाव फुटले.

Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात एकूण 67 गावाचा संपर्क अद्याप तुटलेला 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 11 गावांचा संपर्क तुटला तर जालना जिल्ह्यात 2 गावाचा, परभणी जिल्ह्यात 30 तर लातूर 20 गावाचा संपर्क तुटलेला आहे. पुरामध्ये सध्या अडकले लोकांची संख्या 214 आहे. ज्यामध्ये जालना 35 बीड 29 धाराशिव 150 नागरिकांचा समावेश आहे. मराठवाड्यात 548 लोकांना स्थलांतरित केले. ज्यामध्ये जालना 90 बीड 442 धाराशिव 150 इतक्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहे. परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तीन तुकड्या आर्मीच्या तैनात करण्यात आल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यात आर्मी बचाव काम करते आहे, तर परभणी आणि बीडमध्ये काही वेळात आर्मी पोहोचेल. एनडीआरएफ देखील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. त्यांच्याकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाघेगव्हाण 150 लोक पुरात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ आणि आर्मीचे प्रयत्न सुरू आहेत. 

यंदाच्या खरीप हंगामात जवळपास बाराशे मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक मंडळामध्ये दुबार, तिबार अतिवृष्टी झाली आहे. १७ सप्टेंबरपर्यंत १८ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं होतं. तर १८ सप्टेंबरपासून ते रविवार पर्यंत ४ लाख ९१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत जुलै ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई च्या मदतीपोटी ६९६ कोटी मिळाले आहेत. तर ७२१ कोटी मिळावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यावरून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. विम्यातून मदत मिळणार तातडीची मदत मिळणार नाही. पीक कापणीच्या प्रयोगानंतर विमा मिळणार असल्याचं सांगितलं जातंय.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget