एक्स्प्लोर

Jayakwadi Dam Water Issue : जायकवाडी पाणी प्रश्न पेटणार? वरील धरणातून पाणी सोडण्याची मराठवाड्यातील आमदारांची मागणी

Jayakwadi Dam Water Issue : जायकवाडीत 47 टक्के पाणीसाठा असून, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत 95 टक्के साठा आहे.

Jayakwadi Dam Water Issue : मराठवाड्यात जेव्हा-जेव्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी नेहमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील (Marathwada) पाण्याचा वाद पाहायला मिळतो. यंदा देखील असाच वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, जायकवाडीत 47 टक्के पाणीसाठा असून, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत 95 टक्के साठा आहे. तर 17 ऑक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पाण्याचा हिशेब झाल्यानंतर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतून जायकवाडी (Jayakwadi Dam) प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया देखील तातडीने करावी, अशी मागणी मराठवाड्यातील आमदारांकडून आत्तापासूनच करण्यात येत आहे. 

आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पत्र पाठवून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठकीनंतर मराठवाड्याच्या  वाट्याला येणारें पाणी तत्काळ सोडण्याची मागणी आमदार चव्हाण आणि बंब यांनी केली आहे. सध्या गोद्वारी नदीपात्रात पाणी असून, त्यामुळे आता पाणी सोडले तर पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच जास्तीत जास्त पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचेल, असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले आहे. त्यामुळे,  बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर आता वरील धरणातून पाणी सोडले जाणार का? याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. 

सतीश चव्हाण यांचे पत्र? 

आमदार सतीश चव्हाण यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, "सन 2023-24 या वर्षीच्या मराठवाड्याच्या विविध भागात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश्य स्थिति व कोरडे पडलेले जलसाठे यामुळे मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई असल्याने मोठा जनक्षोभ निर्माण होत आहे. या विषयी आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठवाडा पाणी परिषदेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन मला प्राप्त झाले आहे.

मराठवाड्यातील पूर्ण असलेल्या पाटबंधारे योजनांचे नियोजन आपल्या अधिपत्याखाली आहे. या वर्षी जायकवाडी प्रकल्पात देखील कमी पाणीसाठा झाला आहे. सबब, महाराष्ट्र जलसंपत्ति नियम प्राधिकरण नियम क्र. 12 (क) मधील तरतुदीनुसार15 ऑक्टोबर अखेर जायकवाडी प्रकल्प व त्याच्या पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पांच्या निर्मित जलसाठयाचा एकत्रित आढावा घेऊन समन्यायी पद्धतीने या धरणातील पाणीसाठयाची टक्केवारी समान राहील असे नियोजन करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावे, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणावरील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले, हजारो मच्छिमार रस्त्यावर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
Chhatrapati Sambhajinagar Crime News: ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Maharashtra Rain: पुणे, सोलापूरकरांना अल्पसा दिलासा, उजनी धरण आलं प्लसमध्ये; रायगडमध्ये 17 धरणे 100 टक्के भरली, तर मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच, खरीप हंगाम संकटात
पुणे, सोलापूरकरांना अल्पसा दिलासा, उजनी धरण आलं प्लसमध्ये; रायगडमध्ये 17 धरणे 100 टक्के भरली, तर मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच, खरीप हंगाम संकटात
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BEST bus Shevpuri: मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
मुंबईत बेस्टच्या ड्रायव्हरने शेवपुरी घ्यायला बस रस्त्यात थांबवली, जाब विचारताच म्हणाला, 'जा तुझ्या बापाला....'
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Embed widget