एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरातील गोदावरी नदीत बुडून चौघांचा मृत्यू, वैजापूरच्या पालखेड गावावर शोककळा

Chhatrapati Sambhaji Nagar: प्राथमिक माहितीनुसार एका मुलगा सापडला असून, त्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गोदावरी नदीत गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील कायगाव टोका येथे असलेल्या गोदावरी नदीत ही घटना घडली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरु केला होता. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यात चौघांचाही मृत्यू झाला आहे. बाबासाहेब गोरे, नागेश गोरे, आकाश गोरे, शंकर घोडके  असे चारही मुलांचे नावं आहेत. 

छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरासंगमच्या गोदावरी नदीत चार जण बुडाले आहे. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील हे तरुण आहे. चारही तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान यात्रेहून परत येत असताना गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरले होते. सुरुवातीला दोन जण बुडाले, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेलं आणखी दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. ज्यात चार तासांनी चारही मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. पण त्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

घटनास्थळी मोठी गर्दी...

कायगाव येथील गोदावरी नदीत चार जण बुडाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नागरिकांकडून मुलांचा शोध घेण्यात आला. तर याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या सहकार्याने शोध मोहीम राबवण्यात आली. दरम्यान एक-एक करून चार तासात चारही मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर घटनास्थळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी देखील धाव घेत, सर्व घटनेचा आढावा घेतला. 

वैजापूरच्या पालखेड गावावर शोककळा

कायगाव येथील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे चारही तरुण वैजापूर तालुक्यातील पालखेड गावातील होते. तर चारही तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान यात्रेहून परत येत असताना गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरले होते. सुरुवातीला दोन जण बुडाले, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेलं आणखी दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेत चारही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालखेड गावावर शोककळा पसरली आहे. तर गावातील अनेकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

GST Raid : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात जीएसटी विभागाचे छापे; सराफा दुकानावर कारवाई

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
IND vs PAK : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला लोळवलं, टीम सूर्याचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाची प्रमुख कारणं
भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
IND vs PAK : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला लोळवलं, टीम सूर्याचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाची प्रमुख कारणं
भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार
पीएम किसानचा 21 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारकडून अपडेट, 'या' शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणं थांबणार
Gold Rate : सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता,  धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता, धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
Embed widget