एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराविरोधात मराठवाड्यातून आतापर्यंत आठ हजार आक्षेप दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar : तर 27 मार्चपर्यंत नागरिकांना या निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवता येणार आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar News: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याच्या शासन निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात मराठवाड्यातून आक्षेप येऊ लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण 8 हजार आक्षेप, हरकतींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काही आक्षेप पोस्टाने देखील येत आहे. तर आक्षेप आणि हरकती यांच्यात रोज वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर 27 मार्चपर्यंत नागरिकांना या निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवता येणार आहे. 

राज्याच्या महसूल प्रशासनाने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याबाबत स्वतंत्र अधिसूचना 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जारी केली. तर महसूल आणि वनविभागाकडून काढण्यात अधिसूचनेत विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नामांतराबाबत 27  मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार नामांतराच्या विरोधात अनेक आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातून सर्वाधिक आक्षेप आणि हरकती नोंदवण्यात आले आहे. 

उपोषणास्थळी आक्षेप नोंदवण्याची व्यवस्था! 

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात 4 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची देखील उपस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी नामांतराच्या निर्णयाला आक्षेप किंवा हरकत नोंदवणारे अर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यासाठी कोणतेही जबरदस्ती नसून, ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून अर्ज भरवून घेतले जात आहे.तसेच शहरातील इतर वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आक्षेप नोंदवणारे अर्ज भरून दिले आहेत. 

आता समर्थनार्थही फॉर्म भरले जाणार...

एकीकडे नामांतराच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जात आहे, तर दुसरीकडे सकल हिंदू एकत्रीकरण समितीकडून समर्थनार्थही अर्ज भरले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निर्णयाला समर्थन असून, कोणत्याही हरकतीचा विचार करू नयेत असे या अर्जात लिहण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात विशेष मोहीम राबवली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Imtiyaz Jaleel : उडवाउडवीचे उत्तर न देता नामांतराबाबत स्पष्ट भूमिका घ्या; उद्योजकांच्या भूमिकेवर जलील यांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget