एक्स्प्लोर

मोठी बातमी! ABP माझाच्या बातमीचा मोठा दणका, 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला

एबीपी माझाच्या (Abp Majha) बातम्यानंतर 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा  (Vima) कंपनीनं स्वीकारला आहे. यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. एबीपी माझाच्या (Abp Majha) बातम्यानंतर 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा  (Vima) कंपनीनं स्वीकारला आहे. माझाच्या बातमीनंतर काही तासात शेतकऱ्यांचा विमा कंपनीनं स्वीकारला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)अजूनही 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दावे फेटाळलेले आहेत. कंपनीने दावे फेटाळण्याचे दिलेले कारण योग्य न वाटल्यास कृषी विभाग कंपनीवर कारवाई करणार आहे. वेळप्रसंगी विमा कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देखील जिल्हा कृषी अधीक्षक देशमुख यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने (insurance company) 70 टक्के शेतकऱ्यांचे (Farmers) दावे फेटाळले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीत 680548 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी विमा कंपन्यांनी 229155 दावे स्वीकारले तर 451393 दावे फेटाळले आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. आता 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा  (Vima) कंपनीनं स्वीकारला आहे. 

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मदत नाही

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पंतप्रधान पीक विमा योजनेतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला जाब विचारला आहे. मात्र आज संध्याकाळपर्यंत उत्तर न आल्यास याबाबत कृषी अधिकरी थेट शासनाकडे विमा कंपनीची तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी पी. आर.देशमुख  यांनी दिली होती. 

छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकविम्याचे 70 रूपये आलेत. पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत. या सर्व प्रकारामुळं शेतकी आक्रमक झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरुनसुद्धा नुकसानभरपाई मिळाली आहे. नुकसान होऊनही मदत का मिळत नाही असा सवालही शेतकरी करत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांचे पिक विम्याचे दावे देखील कंपनीने फेटाळले आहेत. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर आता काही दावे स्वीकारले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणतात, 'मुंबईत पाऊस जास्त झाला, त्यामुळे पंप निकामी ठरले' 
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणतात, 'मुंबईत पाऊस जास्त झाला, त्यामुळे पंप निकामी ठरले' 
Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 08 July 2024 Marathi NewsChembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलंThane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबलेHarbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणतात, 'मुंबईत पाऊस जास्त झाला, त्यामुळे पंप निकामी ठरले' 
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणतात, 'मुंबईत पाऊस जास्त झाला, त्यामुळे पंप निकामी ठरले' 
Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
Embed widget