एक्स्प्लोर

IND VS SA: आहे संघबांधणीची वेळ तरीही...

३ नोव्हेंबर, २०२४ - किवींकडून ०-३ ने दारुण पराभव
२६ नोव्हेंबर, २०२५ - दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने धुव्वा

एका वर्षाच्या अंतराने फक्त प्रतिस्पर्धी वेगळा, निकाल तोच. भारताला व्हाईटवॉश.

मायदेशातील भारतीय संघाची ही कामगिरी तुम्हाआम्हाला प्रचंड व्यथित करणारी आहे तशीच ती बरेच प्रश्न निर्माण करणारीही आहे. आपल्या खेळपट्ट्यांवर,आपल्या प्रेक्षकांसमोर आपलं नाक पाहुण्यांनी येऊन ठेचलंय. ज्या खेळपट्ट्यांवर धावांच्या राशी घालून आपण प्रतिस्पर्ध्यांना डावाने चिरडून टाकत असू, तशाच पिचवर परदेशी टीम आपल्याला लीलया पराभूत करतायत. अनेकदा तर डावामध्ये दोनशेचा टप्पा गाठतानाही आपला घामटा निघालाय. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटींमधील सहा डावांचा आपला स्कोअर पाहा... 46, 462, 156, 245, 263, 121...तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हीच आकडेवारी 189, 93, 201, 140 अशी आहे. म्हणजे फक्त एकदा चारशेपार तर १० पैकी तीनदा दोनशेपारची मजल आपण मारू शकलो. गुवाहाटी कसोटी सामन्यातील आणखी एक आकडेवारी बरंच काही सांगून जाणारीआहे. दक्षिण आफ्रिकेने ४८९ चा पल्ला गाठताना तब्बल १५१.१ ओव्हर्स किल्ला लढवला. त्याच खेळपट्टीवर भारताने पहिल्या डावात ८३.५ तर दुसऱ्या डावात फक्त ६३.५ षटकं टिकाव धरला. म्हणजे दोन्ही डावांत मिळून १४६ च्या आसपास षटकं आपण खेळलो. त्यांच्या एका डावातील ओव्हर्सपेक्षा ही आकडेवारी कमी आहे.

इंग्लंड भूमीवर गिलच्या नेतृत्वाखालील टीमने तगडी फाईट देत १-२ अशा पिछाडीवरून २-२ अशी बरोबरी साधली होती. त्याच टीमची ही गत का झाली? आपल्या खेळपट्ट्यांवर आपली रणनीती का फसली? आपण पाहुण्यांना कमी लेखलं की खेळपट्टीचं आकलन करण्यात कमी पडलो? का संघनिवड चुकली? या प्रश्नांनी आता डोकं वर काढलंय. फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर आपल्या घरच्या मैदानात समोरच्या टीमचा ऑफ स्पिनर हार्मर अवघ्या दोन कसोटींमध्ये १७ विकेट्स काढत मालिकावीर होतो. तिथे आपले अक्षर, जडेजा, वॉशिंग्टन, कुलदीप या सर्व फिरकी गोलंदाजांनी मिळून दोन कसोटी सामन्यांमध्ये २१ च्या आसपास विकेट्स घेतल्यात. म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये आपली कामगिरी घसरलीय हे स्वीकारावं लागेल. आपला संघ ट्रान्झिशन पीरीयडमधून जातोय. पुनर्बांधणी होतेय मान्य. त्यात गिल दुसऱ्या मॅचसाठी उपलब्ध नव्हता. पहिल्या मॅचमध्येही त्याचा सहभाग नसल्यासारखाच होता, हेही मान्य. तरीही आपल्याच मैदानात आपण साधी लढतही देऊ शकलो नाही, हे जीवाला लागतंय. १० तास, १२ तास बॅटिंग करून सामना वाचवण्याचे दिवस आता सरले हे स्वीकारूनही आपण जी अवसानघातकी फलंदाजी केलीय, जे फटके खेळलोय, ते जास्त जिव्हारी लागणारं आहे.

सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण नंतरच्या पिढीत कोहली, रोहित, पुजारा या लिस्टमध्ये रहाणेचंही नाव घ्यावं लागेल. या मंडळींच्या शूजमध्ये पाय ठेवणं सोपं नाही, याची आपल्याला नक्कीच जाणीव झाली असणार. वनडे क्रिकेटचं वाढलेलं प्रमाण, आयपीएलसारख्या  स्पर्धा, त्यातूनही वाढणारी टी-ट्वेन्टीची लोकप्रियता या साऱ्या गोष्टी क्रिकेट फॅन्ससाठी, स्पॉन्सर्ससाठी, क्रिकेट बोर्डांसाठी आवश्यक आहेतच. त्याला विरोध असण्याचं कारण नाही. त्याच वेळी पारंपरिक कसोटी क्रिकेटचा वसा मात्र आपण जपायला हवा.तो जपताना अत्यंत गांभीर्याने संघ बांधणीची प्रक्रिया व्हायला हवी. किवींसोबतच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि शुभमन गिल तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला. कसोटी टीमची पुनर्बांधणी करताना अशा तगड्या टीम्ससोबत अशा सतत होणाऱ्या प्रयोगांनी काय साधणार?

क्रिकेट समालोचक हर्ष भोगले आणि माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादच्या एक्स पोस्टही विचार करायला लावणाऱ्या आहेत. हर्ष भोगले म्हणतात, या कसोटी दर्जाच्या खेळासाठी काही खेळाडू अजूनही तयार नाहीयेत. प्रश्न हा आहे की, खरंच किती तयार आहेत? तर वेंकटेश प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडूंवर भाष्य केलंय. ते म्हणतायत, एखाद्या खेळाडूला अष्टपैलूचा टॅग लावत तुम्ही अकरा खेळाडूंमध्ये घेता आणि त्याला पुरेशी गोलंदाजी करायला देत नाही हे अनाकलनीय आहे. 
वनडे क्रिकेटमध्ये आपण राज्य करतोय. टी-ट्वेन्टीतही आपण सिंहासनावर आहोत, तर इथे कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आपण दोनदा गाठलीय. मग गेल्या दीड वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात खेळताना आपण इतके का गटांगळ्या खातोय? वर उल्लेख केल्याप्रमाणे संघ पुनर्बांधणी प्रक्रियेतून जातोय हे खरंय. क्रिकेट हे ऊन-पावसासारखं आहे. कधी पराभवाच्या उन्हाचे चटके तर कधी विजयाचा, चाहत्यांचा प्रेमाचा पाऊस हा पडणारच. असं असलं तरीही पराभवातही प्रतिस्पर्ध्याचा घामटा काढल्याची शान असावी, माझा आक्षेप हरण्याला नाहीये. हरण्याच्या पद्धतीला आहे. पुढची कसोटी मालिका पुढच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये आहे. आपल्या हातात पुरेसा वेळ आहे. अपेक्षा ही आहे की, कसोटी क्रिकेटमधलं हे पराभवाचं मळभ लवकरात लवकर दूर होईल आणि उमेदीचा नवा सूर्योदय होईल. त्या क्षणाची आपण सारेच क्रिकेटरसिक वाट पाहतोय.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget