एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल; रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा, आंबेडकरांचं आव्हान

Prakash Ambedkar on BJP: "रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा", प्रकाश आंबेडकरांचं भाजपला आव्हान.

Prakash Ambedkar on BJP : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखप्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. तसेच, यावेळी मुसलमान कमळाला मतदान करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "गोध्राची दंगल प्रकरणी मी भाजपवाल्यांना चॅलेंज देतो की, माझ्यासोबत बसा... खुले आम... याचं कारण असं की, रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. पण तो बाहेरुन जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा डिझेल टाका, पेट्रोल टाका पण रेल्वेचा डब्बा बाहेरुन जळत नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो. म्हणजेच रेल्वेचा डब्बा आतून पेटवला जो कोणी आतमध्ये बसला असेल त्यानेच. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, इथे फसवेगिरीचं खूप मोठं षडयंत्र सुरु आहे." 

"यावेळी मला शंभर टक्के माहिती आहे की, मुसलमान कमळाला मतदान करणार नाही. कारण त्याला माहिती आहे की, मी आता मतदान केलं तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

दारु घ्यायची, गांधी घ्यायचे पण मतदान... : प्रकाश आंबेडकर 

"कमळवाले आणि अर्धी चड्डीवाले जर मतं मागायला आले तर तुम्हाला दारू देऊ द्या.... मस्तपैकी प्यायची... कोंबड्या दिल्या तर मस्तपैकी खायच्या... महात्मा गांधी आपल्याकडे पाठवला तरी घ्यायचा पण मतदान कमळाला?", असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणताच लोकांमधून आवाज आला की, नाही करायचं. त्यावर बोलताना लोकशाही वाचली पाहिजे. ही लोकशाही वाचवायची असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका, पण त्यांना मतं देऊ नका, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

अर्धी चड्डी आणि आदिवासी संस्कृती...

"अर्धी चड्डी वाल्यांना आदिवासींची संस्कृती पटत नाही म्हणून आदिवासीच संपला पाहिजे, असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे माझी आदिवासींना विनंती आहे की, अर्धी चड्डी, फुल चड्डीवाल्यांपासून सावध राहा आणि त्यांच्या विरोधात उभे रहा," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Prakash Ambedkar : मुस्लीम समाज भाजपला मतदान देणार नाही, गावागावात गोध्रा होईल

भाजपात गेल्यावर स्वच्छ तांदळासारखा पांढरा शुभ्र होतो : प्रकाश आंबेडकर 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "एखादा भाजपात गेलात की, धुतल्या तांदळसारखा पांढरा शुभ्र होतो. हसन मुश्रीफ जर भाजपात गेले, तर भाजपवाले म्हणतील कारवाई चुकून झाली, त्यांच्याकडे काहीच मिळालं नाही. हसन मुश्रीफ यांच्यासारखा स्वच्छ माणूस दुसरा कुणीच नाही."

जे आपल्याविरोधात, त्यांचा आमदार निवडून जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे : प्रकाश आंबेडकर 

"काल हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली. मी स्वागत करतो पण सरकारला माझा सवाल आहे की, चार्जशीट कधी दाखल करणार? आतापर्यंत यांनी 40 जणांवर धाडी टाकल्यात, पण एकावरही एफआयआर दाखल केलेला नाही," असंही हसन मुश्रीफ म्हणाले. 

दरम्यान, वंचितच्या आदिवासी मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी भागातील अलेवाडी येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाजपाचं वर्चस्व असलेल्या भागात हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Sanjay Gaikwad: बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget