एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल; रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा, आंबेडकरांचं आव्हान

Prakash Ambedkar on BJP: "रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा", प्रकाश आंबेडकरांचं भाजपला आव्हान.

Prakash Ambedkar on BJP : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखप्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. तसेच, यावेळी मुसलमान कमळाला मतदान करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "गोध्राची दंगल प्रकरणी मी भाजपवाल्यांना चॅलेंज देतो की, माझ्यासोबत बसा... खुले आम... याचं कारण असं की, रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. पण तो बाहेरुन जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा डिझेल टाका, पेट्रोल टाका पण रेल्वेचा डब्बा बाहेरुन जळत नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो. म्हणजेच रेल्वेचा डब्बा आतून पेटवला जो कोणी आतमध्ये बसला असेल त्यानेच. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, इथे फसवेगिरीचं खूप मोठं षडयंत्र सुरु आहे." 

"यावेळी मला शंभर टक्के माहिती आहे की, मुसलमान कमळाला मतदान करणार नाही. कारण त्याला माहिती आहे की, मी आता मतदान केलं तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

दारु घ्यायची, गांधी घ्यायचे पण मतदान... : प्रकाश आंबेडकर 

"कमळवाले आणि अर्धी चड्डीवाले जर मतं मागायला आले तर तुम्हाला दारू देऊ द्या.... मस्तपैकी प्यायची... कोंबड्या दिल्या तर मस्तपैकी खायच्या... महात्मा गांधी आपल्याकडे पाठवला तरी घ्यायचा पण मतदान कमळाला?", असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणताच लोकांमधून आवाज आला की, नाही करायचं. त्यावर बोलताना लोकशाही वाचली पाहिजे. ही लोकशाही वाचवायची असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका, पण त्यांना मतं देऊ नका, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

अर्धी चड्डी आणि आदिवासी संस्कृती...

"अर्धी चड्डी वाल्यांना आदिवासींची संस्कृती पटत नाही म्हणून आदिवासीच संपला पाहिजे, असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे माझी आदिवासींना विनंती आहे की, अर्धी चड्डी, फुल चड्डीवाल्यांपासून सावध राहा आणि त्यांच्या विरोधात उभे रहा," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Prakash Ambedkar : मुस्लीम समाज भाजपला मतदान देणार नाही, गावागावात गोध्रा होईल

भाजपात गेल्यावर स्वच्छ तांदळासारखा पांढरा शुभ्र होतो : प्रकाश आंबेडकर 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "एखादा भाजपात गेलात की, धुतल्या तांदळसारखा पांढरा शुभ्र होतो. हसन मुश्रीफ जर भाजपात गेले, तर भाजपवाले म्हणतील कारवाई चुकून झाली, त्यांच्याकडे काहीच मिळालं नाही. हसन मुश्रीफ यांच्यासारखा स्वच्छ माणूस दुसरा कुणीच नाही."

जे आपल्याविरोधात, त्यांचा आमदार निवडून जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे : प्रकाश आंबेडकर 

"काल हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली. मी स्वागत करतो पण सरकारला माझा सवाल आहे की, चार्जशीट कधी दाखल करणार? आतापर्यंत यांनी 40 जणांवर धाडी टाकल्यात, पण एकावरही एफआयआर दाखल केलेला नाही," असंही हसन मुश्रीफ म्हणाले. 

दरम्यान, वंचितच्या आदिवासी मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी भागातील अलेवाडी येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाजपाचं वर्चस्व असलेल्या भागात हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget