एक्स्प्लोर

Agriculture News : यंदा मिरची 'भाव' खाणार, आवक घटल्यानं दरात वाढ; अवकाळी पावसाचा मोठा फटका 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे.

Agriculture News : राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे. मसाल्यामध्ये सर्वात महत्वाची असलेल्या लाल मिरचीला अवकाळी पावसामुळं बुरशी लागत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, भंडाऱ्याच्या बाजारात मिरचीची आवक कमी झाल्यामुळं दरात वाढ झाली आहे. 

Rain : पावसामुळं मिरचीचं नुकसान 

कोरोना काळात मिरचीच्या खरेदीमध्ये घट झाली होती. त्यामुळं यंदा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरचीतून अनेक अपेक्षा होत्या. मात्र अवकाळी पावसामुळं मिरची पिकास चांगलाच मोठा फटका बसला आहे. जेवणाची चव वाढवणाऱ्या लाल मिरचीचे दरही वाढले आहेत. एकीकडं वाढती महागाई आणि दिवसेंदिवस भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडत आहे. लाल मिरची महाग झाली आहे. दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं. 

आवक घटली दरात वाढ

दिवाळीनंतर चांगल्या मिरची बाजारपेठेत येत असल्यानं त्या वर्षभरासाठी घेऊन ठेवाव्यात असा मानस असतो. मात्र, यंदा हीच आवक घटल्यानं मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. वर्षभरासाठी मिरच्या घेताना जरा विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मागणी तेवढीच आहे. मात्र, आवक घटल्याने आता किंमती वाढल्या आहेत. यावेळी मिरचीचे भाव दुप्पट वाढले आहेत.

हिंगोलीसह यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका

हिंगोली जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. काल झालेल्या झालेला पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळं केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अवघ्या 20 मिनिटे झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचे स्वप्न उध्दवस्त झालं आहे. केळी काढणीला आलेली असताना अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसानं मातीमोल झाला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे देखील अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. या पावसामुळं 400 हेक्टरवरील फळबागा, पालेभाज्या, उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, ज्वारी  या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि सर्वे हे केवळ एक शासकीय सोपस्कार तर होत नाही नाही ना? असा देखील सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nandurbar News : नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भंडाऱ्यात भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल 
तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल 
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांनां लगावला टोला
Vidarbha Rain Deficit : मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!
मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget