एक्स्प्लोर

Agriculture News : कृषी पंप धोरण उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर, पोल कोसळल्यानं विद्युत तारा शेतात; तक्रार करुनही महावितरणचं दुर्लक्ष 

शेतीला सिंचन करता यावं, यासाठी महावितरणनं (MSEB) कृषी पंप योजना अस्तित्वात आणली आहे. मात्र हे धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात दित आहे.

Agriculture News : शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीला सिंचन करता यावं, यासाठी महावितरणनं (MSEB) कृषी पंप योजना अस्तित्वात आणली आहे. या मध्यामातून शेती सिंचन करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे. मात्र, हीच योजना आता भंडारा (bhandara) जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या तारांचे पोल कोसळले आहे. त्या तारांचा विद्युत प्रवाहित असन, तारा शेतात अक्षरशः लोंबकळ आहेत. मागील तीन महिन्यांपासून ही परिस्थिती असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करुनही ते दुर्लक्ष करत आहे. यामुळं शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

प्रत्येक शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली यावी, त्यातून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना अस्तित्वात आहेत. याचा फायदा शेतकरी घेऊन प्रगतीही साधत आहेत. किंबहुना शेतात लावलेल्या कृषी पंपांना विद्युत पुरवठा करून शेतकरी समृध्द बनवण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे. अनेकांच्या शेतातील कृषी पंप चालावे, यासाठी शेतातून पोलची उभारणी करुन विद्युत् पुरवठा केला आहे. असं असलं तरी, कृषी पंपासाठी असलेली योजना आता भंडारा जिल्ह्यातील पिंपरी या गावातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरली आहे. 
वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची भीती

शेतकऱ्यांच्या शेतात ठिकठिकाणी पोल उभारलेत मात्र, ते आता कोसळल्यानं मागील तीन महिन्यांपासून त्याच्या तार शेतात अक्षरशः लोंबकळत आहेत. या तारांमध्ये विजेचा पुरवठा असून पुढील 25 शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपांना तो पुरवठा होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरु झाला असल्यानं शेतकरी मजुरांसह शेतात राबत आहेत. शेतात काम करत असताना या लोंबकळत असलेल्या वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची अधिक शक्यता आहे. अगदी शेतात ट्रॅक्टरनं शेतीची मशागत करताना 'देशी जुगाड' करुन एका बांबूनं वीज प्रवाहित तारा उचलून शेतकरी शेतीची मशागत करत आहेत. हा देशी जुगाड कधीही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतनारा आहे. याची वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी केवळ दोन दिवस थांबा म्हणून शेतकऱ्यांना आल्यापावली परतवून लावतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळं संभावित धोका टाळण्यासाठी गावातीलच काही तरुण डीपीतून होणारा विद्युत पुरवठा बंद करून शेतीची कामे आटोपतात. मात्र ही तरुण मंडळी नसली की, शेतकऱ्यांच्या शेतातील कामे खोळंबत असल्याचे चित्र आहे. 

राज्यातील राज्यकर्ते खुर्चीच्या राजकारणात गुंतलेले

सध्या राज्यातील राज्यकर्ते खुर्चीच्या राजकारणात गुंतलेले आहे. राजकीय नेते हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील पिंपरी गावातील शेतकरी जीव धोक्यात घालून शेती करीत असताना त्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष देत नसल्यानं खरोखरचं सरकार शेतकऱ्यांचं आहे का? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Rain Update : वादळीवाऱ्यामुळे तारा तुटल्या, संभाजीनगरमधील दहा हजार घरांची वीज गुल; झाडंही उन्मळून पडली

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget