एक्स्प्लोर

संतोष देशमुख हत्येला 77 दिवस पूर्ण, ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचा एल्गार, मस्साजोगच्या अन्नत्याग आंदोलनाच्या मागण्या काय?

अन्नत्याग आंदोलनापूर्वी झालेल्या पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत अनपेक्षित बाब उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Santosh Deshmukh Case:संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज धनंजय देशमुख यांच्यासह मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी. आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. (Beed)

याप्रकरणी केज पोलिसांनी सुरुवातीला केलेला तपास असमाधानकारक असल्याचं धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाला सांगितलं. अन्नत्याग आंदोलनापूर्वी झालेल्या पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत अनपेक्षित बाब उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. केज पोलीस एसपींच्या कानावर तपास काय झाला हे घालत नसल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. पोलिसांनी आरोपींना अभय दिल्याचा आरोप ही धनंजय देशमुख यांनी केला. (Dhananjay Deshmukh)

न्यायासाठी ग्रामस्थांचा एल्गार

हत्येच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थ हे आंदोलन करत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिल्या दिवशीच मस्साजोगच्या नागरिकांनी दोन दिवस रस्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उतरले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. नंतर वाल्मीक कराड वर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी ही मस्साजोगच्या नागरिकांची होती .यासाठी धनंजय देशमुख यांनीही मोठं आंदोलन केलं .आंदोलनाच्या उद्रेकानंतर वाल्मीक कराड वर गुन्हा दाखल करण्यात आला . आता तिसऱ्यांदा धनंजय देशमुख आणि ग्रामस्थ आंदोलनाला बसलेत .न्यायासाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे .अन्नत्याग आंदोलनात सर्व आरोपींना अटक करून कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे .

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या कार्यशैलीवर पहिल्यापासून संशय व्यक्त करण्यात येत आहे . आधी प्रकरणात काय तपास चालू आहे हे कुटुंबीयांना कळवत नाहीत अशी तक्रार होती .त्यानंतर आरोपींना मदत केल्याचा आरोप करण्यात आला . आज अन्नत्याग आंदोलना दिवशी पोलीस अधीक्षकांची झालेल्या चर्चेदरम्यानही पोलिसांची भूमिका असमाधानकारक असल्याचं धनंजय देशमुख सांगत आहेत .

ग्रामस्थांसह धनंजय देशमुख यांच्या मागण्या काय? 

कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे.

कृष्णा आंधळ्याच्या समर्थक अजूनही त्याचे स्टेटस ठेवतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ते प्राणघात हल्ले करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे.

सरकारी वकिलांची नियुक्ती करावी. 

हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात अंडरट्रायल चालायला हवं.

 

हेही वाचा:

Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh : कृष्णा आंधळेला अटक करा; धनंजय देशमुख आक्रमक

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवरील हल्ला, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीनं उचललं टोकाचं पाऊल, पोलिस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवरील हल्ला, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीनं उचललं टोकाचं पाऊल, पोलिस घटनास्थळी दाखल
कौटुंबिक वाद विकोपाला, मुलानेच संपवलं वडिलांना, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कौटुंबिक वाद विकोपाला, मुलानेच संपवलं वडिलांना, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Sanjay Rathod : वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget