एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार

Beed crime: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरुन पोलीस यंत्रणा टीकेची धनी ठरत आहे. एसआयटी प्रमुख आज बीडमध्ये जाऊन तपासाची सूत्रे हाती घेणार

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून हत्याप्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहेत. या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मिक कराड यांनादेखील बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या सीआयडीचे अधिकारी कराड यांची कसून चौकशी करत आहेत. अशातच आता या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख डॉ. बसवराज तेली आज बीडमध्ये येऊन तपासाचा चार्ज घेतील.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांचे एसआयटी पथक बुधवारी गठित झाले. या पथकाचे नेतृत्त्व पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे देण्यात आले होते. ते आज बीड पोलीस ठाण्यात येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहेत. यानंतर ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या केज परिसरात जाऊन पाहणी करणार आहेत. याप्रकरणातील 3 मारेकरी अद्याप फरार आहे. तर वाल्मिक कराड यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांच्याविरोधात कलम 302 लावावे, अशी मागणी केली जात आहे. त्यादृष्टीने एसआयटी आणि सीआयडीचा तपास महत्त्वाचा मानला जात आहे. 

बीड पोलीस ठाण्यात आणलेले ते पलंग कुठे?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री ट्विट करत बीड शहर पोलीस ठाण्यात अचानक 5 पलंग आणण्यात आल्याचे ट्विट केले होते. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहेत. वाल्मिक कराड याच ठिकाणी असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये वाल्मीक कराड यांना ठेवण्यात आले आहे या ठिकाणी अर्थात बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे. काल बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी येथे पाच पलंग आणि बेड आणण्यात आले होते. मात्र यावर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून आत्ताच  बेड कसे मागवले गेले असा प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच रोहित पवार यांनी या पोलीस स्टेशनमध्ये आता एसी सुद्धा बसून घ्या, असा खोचक टोला लगावला होता. दरम्यान, वाल्मिक कराड यांची प्रकृती बुधवारी रात्री पुन्हा एकदा बिघडली होती. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मास्क लावावा लागला होता.

वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, सगळंच बाहेर येईल: सचिन खरात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे. परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला, मग खरंच वाल्मीक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मीक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला. या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मीक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल, असे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी उफाळली, टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखासह सात जणांवर गुन्हा दाखल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget