एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार

Beed crime: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरुन पोलीस यंत्रणा टीकेची धनी ठरत आहे. एसआयटी प्रमुख आज बीडमध्ये जाऊन तपासाची सूत्रे हाती घेणार

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये ठाण मांडून हत्याप्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहेत. या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणारे वाल्मिक कराड यांनादेखील बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या सीआयडीचे अधिकारी कराड यांची कसून चौकशी करत आहेत. अशातच आता या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख डॉ. बसवराज तेली आज बीडमध्ये येऊन तपासाचा चार्ज घेतील.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांचे एसआयटी पथक बुधवारी गठित झाले. या पथकाचे नेतृत्त्व पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे देण्यात आले होते. ते आज बीड पोलीस ठाण्यात येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहेत. यानंतर ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या केज परिसरात जाऊन पाहणी करणार आहेत. याप्रकरणातील 3 मारेकरी अद्याप फरार आहे. तर वाल्मिक कराड यांच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांच्याविरोधात कलम 302 लावावे, अशी मागणी केली जात आहे. त्यादृष्टीने एसआयटी आणि सीआयडीचा तपास महत्त्वाचा मानला जात आहे. 

बीड पोलीस ठाण्यात आणलेले ते पलंग कुठे?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री ट्विट करत बीड शहर पोलीस ठाण्यात अचानक 5 पलंग आणण्यात आल्याचे ट्विट केले होते. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहेत. वाल्मिक कराड याच ठिकाणी असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये वाल्मीक कराड यांना ठेवण्यात आले आहे या ठिकाणी अर्थात बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे. काल बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी येथे पाच पलंग आणि बेड आणण्यात आले होते. मात्र यावर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून आत्ताच  बेड कसे मागवले गेले असा प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच रोहित पवार यांनी या पोलीस स्टेशनमध्ये आता एसी सुद्धा बसून घ्या, असा खोचक टोला लगावला होता. दरम्यान, वाल्मिक कराड यांची प्रकृती बुधवारी रात्री पुन्हा एकदा बिघडली होती. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मास्क लावावा लागला होता.

वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, सगळंच बाहेर येईल: सचिन खरात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे. परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला, मग खरंच वाल्मीक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मीक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला. या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मीक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल, असे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
Beed Railway: बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना
बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना
विलास घुले मृत्यू प्रकरण! साक्षीदार उमेश मानेवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप, पोलिसांकडून अटक, चौकशी सुरु 
विलास घुले मृत्यू प्रकरण! साक्षीदार उमेश मानेवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप, पोलिसांकडून अटक, चौकशी सुरु 

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget